शहरं
Join us  
Trending Stories
1
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
2
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
5
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
6
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
7
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
8
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
9
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
10
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
11
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
12
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
13
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
14
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
15
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
16
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
17
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
18
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
19
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
20
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?

सुसूत्रीकरणात एसटी आगारांवरही गदा

By admin | Updated: September 26, 2016 02:54 IST

ग्रामीण भाग शहरी भागाला जोडणाऱ्या एसटी महामंडळाने मोठ्या प्रमाणात सुसूत्रीकरणाचे धोरण अवलंबले आहे

मुंबई : ग्रामीण भाग शहरी भागाला जोडणाऱ्या एसटी महामंडळाने मोठ्या प्रमाणात सुसूत्रीकरणाचे धोरण अवलंबले आहे. यातून अनेक लांब पल्ल्याच्या फेऱ्यांवर गदा आणली जात असून, त्याचा परिणाम प्रवाशांवर होत आहे. सुसूत्रीकरणातून लांब पल्ल्याच्या फेऱ्या कमी केल्या जात असतानाच, हळूहळू काही आगारांची संख्या कमी केली जाणार आहे. त्यासाठी राज्यातील आगारांचा आढावा घेतला जात असून, ३0 किलोमीटरच्या आत असणाऱ्या एकापेक्षा जास्त आगारांपैकी एक आगार बंद केले जाईल. यातून महामंडळाचा खर्च वाचविण्याचा प्रयत्न असला, तरी स्थानिकांना मात्र दुसऱ्या आगारात जाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक आगार याप्रमाणे १९९0 सालापासून राज्यातील एसटी आगारांची संख्या हळूहळू वाढवण्यात आली. याप्रमाणे, महामंडळाचे राज्यात २५१ आगार आहेत. मात्र, आगारांची संख्या वाढत गेल्यावर मनुष्यबळही वाढत गेले आणि त्याबरोबर, देखभाल-दुरुस्तीसह अन्य खर्चही. त्यामुळे मोठ्या खर्चाला तोंड द्यावे लागले. त्यामुळे अनेक आगारही तोट्यात असल्याचे कारण पुढे करत, एसटी महामंडळाने फेऱ्यांचे सुसूत्रीकरण करण्यास सुरुवात केली आहे. एकाच ठिकाणाहून लांब पल्ल्याच्या फेऱ्या एकमेकांना समांतर धावत असल्याने, अशा फेऱ्या कमी करणाऱ्यावर महामंडळाकडून भर दिला जात आहे.लांब पल्ल्याच्या फेऱ्या बंद करून काही फेऱ्या एका आगारातून जवळच्याच आगारात वळत्या करून, टप्प्याटप्प्यात एकाच परिसरातील दोनपैकी एक आगार बंद करण्याचे नियोजन केले असल्याचे, एसटीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. सुसूत्रीकरणासंदर्भात एसटी महामंडळाच्या गेल्या काही दिवसांत बैठकाही झाल्या. या बैठकीत आगारांचा आढावा घेण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली. ३० किमी अंतरातील एकापेक्षा जास्त असणाऱ्या आगारांबरोबर १०० पेक्षा कमी फेऱ्या असणारी आगारे टप्प्याटप्प्याने बंद होतील. बंद होणाऱ्या आगारातील फेऱ्या व देखभाल-दुरुस्ती ही जवळच्याच आगारात हळूहळू वळती केली जाणार आहे.