शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

सुसूत्रीकरणात एसटी आगारांवरही गदा

By admin | Updated: September 26, 2016 02:54 IST

ग्रामीण भाग शहरी भागाला जोडणाऱ्या एसटी महामंडळाने मोठ्या प्रमाणात सुसूत्रीकरणाचे धोरण अवलंबले आहे

मुंबई : ग्रामीण भाग शहरी भागाला जोडणाऱ्या एसटी महामंडळाने मोठ्या प्रमाणात सुसूत्रीकरणाचे धोरण अवलंबले आहे. यातून अनेक लांब पल्ल्याच्या फेऱ्यांवर गदा आणली जात असून, त्याचा परिणाम प्रवाशांवर होत आहे. सुसूत्रीकरणातून लांब पल्ल्याच्या फेऱ्या कमी केल्या जात असतानाच, हळूहळू काही आगारांची संख्या कमी केली जाणार आहे. त्यासाठी राज्यातील आगारांचा आढावा घेतला जात असून, ३0 किलोमीटरच्या आत असणाऱ्या एकापेक्षा जास्त आगारांपैकी एक आगार बंद केले जाईल. यातून महामंडळाचा खर्च वाचविण्याचा प्रयत्न असला, तरी स्थानिकांना मात्र दुसऱ्या आगारात जाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक आगार याप्रमाणे १९९0 सालापासून राज्यातील एसटी आगारांची संख्या हळूहळू वाढवण्यात आली. याप्रमाणे, महामंडळाचे राज्यात २५१ आगार आहेत. मात्र, आगारांची संख्या वाढत गेल्यावर मनुष्यबळही वाढत गेले आणि त्याबरोबर, देखभाल-दुरुस्तीसह अन्य खर्चही. त्यामुळे मोठ्या खर्चाला तोंड द्यावे लागले. त्यामुळे अनेक आगारही तोट्यात असल्याचे कारण पुढे करत, एसटी महामंडळाने फेऱ्यांचे सुसूत्रीकरण करण्यास सुरुवात केली आहे. एकाच ठिकाणाहून लांब पल्ल्याच्या फेऱ्या एकमेकांना समांतर धावत असल्याने, अशा फेऱ्या कमी करणाऱ्यावर महामंडळाकडून भर दिला जात आहे.लांब पल्ल्याच्या फेऱ्या बंद करून काही फेऱ्या एका आगारातून जवळच्याच आगारात वळत्या करून, टप्प्याटप्प्यात एकाच परिसरातील दोनपैकी एक आगार बंद करण्याचे नियोजन केले असल्याचे, एसटीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. सुसूत्रीकरणासंदर्भात एसटी महामंडळाच्या गेल्या काही दिवसांत बैठकाही झाल्या. या बैठकीत आगारांचा आढावा घेण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली. ३० किमी अंतरातील एकापेक्षा जास्त असणाऱ्या आगारांबरोबर १०० पेक्षा कमी फेऱ्या असणारी आगारे टप्प्याटप्प्याने बंद होतील. बंद होणाऱ्या आगारातील फेऱ्या व देखभाल-दुरुस्ती ही जवळच्याच आगारात हळूहळू वळती केली जाणार आहे.