शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

खान्देशात दुबार पेरणीही वाया जाण्याची भीती

By admin | Updated: July 13, 2017 05:03 IST

सात दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खान्देशातील जळगाव, धुळे, आणि नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामाची स्थिती गंभीर बनली

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव/ धुळे/ नंदुरबार : सात दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खान्देशातील जळगाव, धुळे, आणि नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामाची स्थिती गंभीर बनली आहे. जळगाव जिल्ह्यात दुबार पेरणीही वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. धुळे जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट अटळ असल्याचे चित्र आहे. नंदुरबार जिल्ह्यात अनियमित पावसामुळे केवळ ४३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. भरपावसाळ्यात जळगाव जिल्ह्यात तब्बल ४५ गावांना २३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात ४० टक्के पेरण्यांनी कसाबसा तग धरला असून, ६० टक्के पेरण्या वाया जाण्याची स्थिती आहे. तब्बल २० दिवस पावसाने दडी मारली आहे. बियाणे वाया गेल्याने काही ठिकाणी दुबार पेरणी झाली. मात्र बियाण्यास व कोंबांना किडे, मुंग्या लागू लागल्या आहेत. जिल्ह्यात १० जुलैपर्यंत केवळ १९.७ टक्केच पावसाची नोंद झाली आहे.धुळे जिल्ह्यात पावसाने मोठी दडी मारली. पीकवाढीच्या टप्प्यात पाऊस होत नसल्याने त्यांची वाढ खुंटली असून, ती जळण्याच्या मार्गावर आहेत. मूग, उडीद या कडधान्यांसह सोयाबीन, मका पिकांनाही या खंडाचा फटका बसला आहे. नंदुरबार जिल्ह्याला अनियमित पावसाचा फटका बसला असून, आतापर्यंत केवळ ४३ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे़ जिल्ह्यात निर्धारित दोन लाख ६९ हजार क्षेत्रापैकी ३० जूनपर्यंत केवळ दोन हजार ७३५ हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या.