शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

खान्देशात दुबार पेरणीही वाया जाण्याची भीती

By admin | Updated: July 13, 2017 05:03 IST

सात दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खान्देशातील जळगाव, धुळे, आणि नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामाची स्थिती गंभीर बनली

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव/ धुळे/ नंदुरबार : सात दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खान्देशातील जळगाव, धुळे, आणि नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामाची स्थिती गंभीर बनली आहे. जळगाव जिल्ह्यात दुबार पेरणीही वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. धुळे जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट अटळ असल्याचे चित्र आहे. नंदुरबार जिल्ह्यात अनियमित पावसामुळे केवळ ४३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. भरपावसाळ्यात जळगाव जिल्ह्यात तब्बल ४५ गावांना २३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात ४० टक्के पेरण्यांनी कसाबसा तग धरला असून, ६० टक्के पेरण्या वाया जाण्याची स्थिती आहे. तब्बल २० दिवस पावसाने दडी मारली आहे. बियाणे वाया गेल्याने काही ठिकाणी दुबार पेरणी झाली. मात्र बियाण्यास व कोंबांना किडे, मुंग्या लागू लागल्या आहेत. जिल्ह्यात १० जुलैपर्यंत केवळ १९.७ टक्केच पावसाची नोंद झाली आहे.धुळे जिल्ह्यात पावसाने मोठी दडी मारली. पीकवाढीच्या टप्प्यात पाऊस होत नसल्याने त्यांची वाढ खुंटली असून, ती जळण्याच्या मार्गावर आहेत. मूग, उडीद या कडधान्यांसह सोयाबीन, मका पिकांनाही या खंडाचा फटका बसला आहे. नंदुरबार जिल्ह्याला अनियमित पावसाचा फटका बसला असून, आतापर्यंत केवळ ४३ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे़ जिल्ह्यात निर्धारित दोन लाख ६९ हजार क्षेत्रापैकी ३० जूनपर्यंत केवळ दोन हजार ७३५ हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या.