शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

भातशेतीवर यंदाही दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: July 4, 2016 03:46 IST

भात बियाण्याची पेरणी केलेली खाचरे अनेक दिवसांपासून पाण्याखाली गेल्याने बियाणे कुजून दुबार पेरणीचे संकट बळीराजाला सतावू लागले आहे.

अनिरुद्ध पाटील,

डहाणू/बोर्डी- डहाणू तालुक्यास मुसळधार पावसाने चांगलेचे जोडपले असून, भात बियाण्याची पेरणी केलेली खाचरे अनेक दिवसांपासून पाण्याखाली गेल्याने बियाणे कुजून दुबार पेरणीचे संकट बळीराजाला सतावू लागले आहे. दरम्यान या बाबत शासनाने भात उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. डहाणू तालुक्यातील भात हे प्रमुख पीक असून सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रावर त्याची खरीपात लागवड केली जाते. तालुक्यात २१ जून नंतर पावसाने हजेरी लावल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी भात पेरणीला प्रारंभ केला. मात्र गेल्या दहा दिवसांपासून पावसाचा जोर वाढून नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. पाणथळ जमिनीप्रमाणेच बोर्डी आणि परिसरातील किनाऱ्यालगत गावच्या भात खाचरांमध्ये पुराचे पाणी साचले आहे. त्यामुळे पेरलेले बियाणे अनेक दिवस पाण्याखाली राहिल्याने कुजले आहे. तर, काही प्रमाणात उगवण झालेली रोपे सुस्थितीत नाहीत. सततच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केलेली नाही. त्यामुळे किनाऱ्यालगतच्या गावातील शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट सतावते आहे. शासनाने पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून केवळ कर्जत ३ या भात वाणाची विक्र ी डहाणूतील शेतकऱ्यांना केली होती. अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी महागाईचा फटका सहन करून ८५ ते ११० रुपये प्रतिकिलोने मिळणारे संकरीत बियाणे खरेदी केले होते. मात्र सततच्या पावसाने पेरणी वाया जाऊन आर्थिक फटका बसला असून लावणीचा हंगाम लांबणीवर गेला आहे. त्याचा परिणाम भात उत्पादनावर होणार असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.>पावसाने घेतली उसंत; पाणी ओसरल्याने वसईकरांना दिलासावसई : काल रात्रीपासून पावसाने उसंत घेतल्याने वसई विरार परिसरात अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा होऊन लोकांना दिलासा मिळाला आहे. वसईतील जनजीवन सकाळपासून पूर्वपदावर आले. गेले दोन दिवस वसईकरांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले होते. नालासोपारा शहरात दोन दिवस पाणी तुंबून राहिले होते. नागाव रेल्वे स्टेशनवरील सबवेत पाणी शिरले होते. तर सनसिटी-गास रस्ता दिवभर पाण्याखाली गेला होता. शनिवारी रात्रीपासून पावसाने उसंत घेतल्याने सगळीकडील पाणी ओसरून वसईकरांना दिलासा मिळाला.