शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

गगनचुंबी इमारतींमुळे मुंबईवर विमान दुर्घटनेचे सावट

By admin | Updated: July 8, 2015 02:40 IST

गगनचुंबी इमारतींमुळे मुंबईवर विमान दुर्घटनेचे सावट असून, या परिसरात अधिक उंचीच्या इमारतींना परवानगी दिली जाऊ नये अशी मागणी राज्य सरकारने केली आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ व जुहू विमानतळाजवळ होऊ घातलेल्या गगनचुंबी इमारतींमुळे मुंबईवर विमान दुर्घटनेचे सावट असून, या परिसरात अधिक उंचीच्या इमारतींना परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. विमानतळापासून २० कि़ मी. अंतरात बांधकाम करण्यासाठी विमान प्राधिकरण परवानगी देते. याअंतर्गत ४९.८७ मीटर उंचीच्या इमारतींना परवानगी दिली जात होती. मात्र इमारतींना उंचीसंदर्भात देण्यात येणाऱ्या ना-हरकत प्रमाणपत्रांचे निकष ठरवण्यासाठी नेमण्यात आलेल्या नेगी समितीने उंचीची मर्यादा ५६.२७ मीटरपर्यंत वाढविली. त्यानंतर २००८ -१२ या काळात जुहू व आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात २०० इमारतींना परवानगी देण्यात आली आहे. या इमारतींमुळे मुंबईला विमान दुर्घटनेचा धोका आहे, असा दावा करणारी जनहित याचिका अ‍ॅड. यशवंत शिनॉय यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. तसेच या दोन्ही विमानतळांच्या धावपट्टीजवळ सुरक्षेचे कोणतेही उपाय करण्यात आलेले नाहीत. या धावपट्टींजवळ सुरक्षेचे उपाय करावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.या याचिकेवर प्रत्युत्तर सादर करताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लि. ने व नागरी दळणवळण महासंचालकांनी ही जबाबदारी आमची नसल्याचा दावा केला. तर विमानतळ प्राधिकरणाने नेगीच्या रिपोर्टनुसार विमानतळ परिसरात इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचे म्हटले आहे. अ‍ॅड. शिनॉय यांनी मंगळवारी या सर्व प्रतिज्ञापत्राचा तपशील न्या. व्ही. एम. कानडे व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सांगितला. याचे प्रत्युत्तर सादर करण्यास वेळ मागितला. तसेच या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्याची मागणी केली. त्याची दखल घेत न्यायालयाने या याचिकेवर पुढील शुक्रवारी सुनावणी होणार असल्याचे जाहीर केले. (प्रतिनिधी)

लँडिंग-टेकऑफवेळी संपर्क तुटण्याची भीती
 
लँडिंग होताना पायलट एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या संपर्कात असतो. कंट्रोलच्या दिशा निर्देशानुसार विमानाचे सुरक्षित लँडिंग होते. असे असताना 56.27 मीटर उंचीच्या इमारती विमानतळ परिसरात उभ्या राहिल्यास पायलटचा व कंट्रोलच्या संपर्कातही अडचणी निर्माण होण्याचा मोठा धोका आहे. नेमके लँडिंग व टेकऑफवेळी संपर्क तुटल्यास मोठी विमान दुर्घटना होऊ शकते, असा दावा याचिकाकत्र्याने केला आहे.
------------------... शेकडो नागरिकांचा जाऊ शकतो बळीमुळात आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसराला झोपड्यांचा विळखा अधिक आहे. यामुळे विमान दुर्घटना झाल्यास येथील शेकडो नागरिकांचा बळी जाऊ शकतो. तिच परिस्थिती जुहू विमानतळाची आहे. हा परिसर देखील झोपड्यांनी व्याप्त असून अधिक उंचीच्या इमारतींची संख्या देखील या परिसरात आहे. जुहू विमानतळावर सध्या ओएनजीसीसह खाजगी विमानांचे आवागमन असते.