शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
2
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
3
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
4
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
5
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
6
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
7
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
8
गब्बर सिंगला डायलॉग शिकवल्यावरुन ट्रोल होतायेत महागुरु, नक्की काय म्हणाले होते?; पाहा Video
9
Jyeshtha Amavasya 2025: घरातले आजारपण, भांडणतंटा काढता पाय घेत नसेल तर ज्येष्ठ अमावास्येला करा 'हे' उपाय!
10
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
11
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
12
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
13
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
14
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
15
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
17
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
18
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
19
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
20
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!

गगनचुंबी इमारतींमुळे मुंबईवर विमान दुर्घटनेचे सावट

By admin | Updated: July 8, 2015 02:40 IST

गगनचुंबी इमारतींमुळे मुंबईवर विमान दुर्घटनेचे सावट असून, या परिसरात अधिक उंचीच्या इमारतींना परवानगी दिली जाऊ नये अशी मागणी राज्य सरकारने केली आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ व जुहू विमानतळाजवळ होऊ घातलेल्या गगनचुंबी इमारतींमुळे मुंबईवर विमान दुर्घटनेचे सावट असून, या परिसरात अधिक उंचीच्या इमारतींना परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. विमानतळापासून २० कि़ मी. अंतरात बांधकाम करण्यासाठी विमान प्राधिकरण परवानगी देते. याअंतर्गत ४९.८७ मीटर उंचीच्या इमारतींना परवानगी दिली जात होती. मात्र इमारतींना उंचीसंदर्भात देण्यात येणाऱ्या ना-हरकत प्रमाणपत्रांचे निकष ठरवण्यासाठी नेमण्यात आलेल्या नेगी समितीने उंचीची मर्यादा ५६.२७ मीटरपर्यंत वाढविली. त्यानंतर २००८ -१२ या काळात जुहू व आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात २०० इमारतींना परवानगी देण्यात आली आहे. या इमारतींमुळे मुंबईला विमान दुर्घटनेचा धोका आहे, असा दावा करणारी जनहित याचिका अ‍ॅड. यशवंत शिनॉय यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. तसेच या दोन्ही विमानतळांच्या धावपट्टीजवळ सुरक्षेचे कोणतेही उपाय करण्यात आलेले नाहीत. या धावपट्टींजवळ सुरक्षेचे उपाय करावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.या याचिकेवर प्रत्युत्तर सादर करताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लि. ने व नागरी दळणवळण महासंचालकांनी ही जबाबदारी आमची नसल्याचा दावा केला. तर विमानतळ प्राधिकरणाने नेगीच्या रिपोर्टनुसार विमानतळ परिसरात इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचे म्हटले आहे. अ‍ॅड. शिनॉय यांनी मंगळवारी या सर्व प्रतिज्ञापत्राचा तपशील न्या. व्ही. एम. कानडे व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सांगितला. याचे प्रत्युत्तर सादर करण्यास वेळ मागितला. तसेच या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्याची मागणी केली. त्याची दखल घेत न्यायालयाने या याचिकेवर पुढील शुक्रवारी सुनावणी होणार असल्याचे जाहीर केले. (प्रतिनिधी)

लँडिंग-टेकऑफवेळी संपर्क तुटण्याची भीती
 
लँडिंग होताना पायलट एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या संपर्कात असतो. कंट्रोलच्या दिशा निर्देशानुसार विमानाचे सुरक्षित लँडिंग होते. असे असताना 56.27 मीटर उंचीच्या इमारती विमानतळ परिसरात उभ्या राहिल्यास पायलटचा व कंट्रोलच्या संपर्कातही अडचणी निर्माण होण्याचा मोठा धोका आहे. नेमके लँडिंग व टेकऑफवेळी संपर्क तुटल्यास मोठी विमान दुर्घटना होऊ शकते, असा दावा याचिकाकत्र्याने केला आहे.
------------------... शेकडो नागरिकांचा जाऊ शकतो बळीमुळात आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसराला झोपड्यांचा विळखा अधिक आहे. यामुळे विमान दुर्घटना झाल्यास येथील शेकडो नागरिकांचा बळी जाऊ शकतो. तिच परिस्थिती जुहू विमानतळाची आहे. हा परिसर देखील झोपड्यांनी व्याप्त असून अधिक उंचीच्या इमारतींची संख्या देखील या परिसरात आहे. जुहू विमानतळावर सध्या ओएनजीसीसह खाजगी विमानांचे आवागमन असते.