शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सचिनच्या शिफारशीमुळेच धोनी कॅप्टन

By admin | Updated: December 25, 2015 10:26 IST

भारताची टीम इंग्लंडला होती त्यावेळी राहूल द्रवीडने सांगितले की मला कॅप्टनशिप नको. माझ्या खेळावर परिणाम होतोय. बॅटिंगवर परिणाम होतो. कुणाला कॅप्टन करायचं?

भारताची टीम इंग्लंडला होती त्यावेळी राहूल द्रवीडने सांगितले की मला कॅप्टनशिप नको. माझ्या खेळावर परिणाम होतोय. बॅटिंगवर परिणाम होतो. कुणाला कॅप्टन करायचं? यावर सचिनचे नाव सुचविले. मात्र, खेळावर परिणाम होतो म्हणून त्यानेही नकार दिला. सचिननेच महेंद्रसिंह धोनीचे नाव सुचविले. राहुल द्रविडला काढलं आणि सचिनला कॅप्टनशिप दिली नाही तर... उद्या पेपरमध्ये छापून आले, की अध्यक्षांनी हस्तक्षेप केला आणि या दोघांना डावलून धोनीला कॅप्टन केले. मात्र, सचिन म्हणाला, साहेब, मी प्रामाणिकपणे सांगतो, की या देशाला अभिमान वाटावा असा हा कॅप्टन होईल. त्याची खेळाशी कमिटमेंट चांगली आहे. सगळ्या खेळाडूंशी चांगला सुसंवाद आहे. कितीही टेन्शन आले, तरी त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. तुम्ही त्याची निवड करा. निवड समितीचे अध्यक्ष दिलीप वेंगसरकर होते. समितीने सचिनची शिफारस मान्य केली आणि धोनीची निवड केली. त्याची शिफारस १०० टक्के योग्य ठरली. देशाच्या किक्रेटचा इतिहास घडविण्यासाठी महेंद्रसिंह धोनीने प्रचंड योगदान दिलं. त्याच्या नेतृत्वात देशाने वर्ल्ड कप जिंकला. मला जसे धोनीच कर्तृत्व मोठे वाटते, तसेच सचिनचेही वाटते. कॅप्टनशिप आपल्याकडे येत असतानाही कॅप्टनचे गुण आपल्यापेक्षा दुसऱ्या खेळाडूत अधिक आहेत. तोआपल्या पेक्षा ज्युनियर असला तरी त्याच्या नेतृत्वाखाली खेळायची तयारी सचिनने दाखवली. माझ्या मते, हेही मोठे योगदान आहे.

शरद पवारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणा-या स्लाईडशोसाठी इथे क्लिक करा. 
शरद जोशींनी शिकविले अर्थशास्त्र शरद जोशी यांचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांना अर्थशास्त्र शिकवायचे काम केले. आर्थिक व्यवहार, त्यामागची कल्पना सांगण्याबाबतची मांडणी केली; पण शरद जोशींनी जी भूमिका घेतली त्याच्याशी सातत्य ठेवले नाही. कांद्याचे आंदोलन हे पहिले आंदोलन त्यांच्या नेतृत्वाखाली झाले. त्या वेळी मी महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता होता. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सभागृहाला बोललो. मी त्यांना सांगितले, याबाबत निकाल घ्यायचे असतील तर ते विधानसभेत घेता येतील, संसदेत घेता येतील. म्हणून तेथे गेले पाहिजे. शरद जोशींचे म्हणणे स्पष्ट होते, की शेतकऱ्यांची चळवळ पुढे न्यायची असेल, तर निवडणुकीपासून बाजूला राहायला पाहिजे. म्हणून त्यांनी भाषण केले, ‘मी मत मागायला आलो तर मला जोडे मारा.’ तेच शरद जोशी त्यानंतर काही पक्षांत जाऊन निवडणुकीसाठी उभे राहिले. नांदेड येथे त्यांचा पराभव झाला. मी त्यांना सांगत होतो, की आपण एकत्र काम करू. निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र येऊ, शेतकऱ्यांची शक्ती उभी करू. पण तो रस्ता त्यांना पसंत पडला नाही. या कारणावरून आमच्यात मतभेद होते.
 
शरद पवारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणा-या स्लाईडशोसाठी इथे क्लिक करा. 
लोकांच्या शहाणपणामुळेच टिकली लोकशाहीलोकांचा पाठिंबा हा कायमस्वरूपी नसतो. लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली कधीही मिळालं नव्हतं तेवढं यश भारतीय जनता पक्षाला मिळालं. याचं शंभर टक्के श्रेय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला जातं; पण एका वर्षाच्या कालखंडात गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यांत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. याचा अर्थ, लोक आम्हा सगळ्यांना कायम स्वातंत्र्य देतात असं नव्हे, आम्ही ठीक रस्त्यावर जातो तोपर्यंत लोक आम्हाला साथ देतात. त्यांच्या मनाला असं वाटलं, की आम्ही ट्रॅक बदलतोय तर त्यासंबंधीचा निकाल द्यायला लोक कधी कचरत नाहीत. या देशाची संसदीय लोकशाही पद्धत जी टिकली आहे, ती देशातील लोकांच्या शहाणपणामुळे टिकली आहे. आमचा शहाणपणा त्याच्यापेक्षा मर्यादित आहे.