शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

पावसाने उसंत देताच मशागत, निंदणाच्या कामाला वेग !

By admin | Updated: August 9, 2016 02:16 IST

विदर्भातील पिकांची वाढ खुंटली; तण मात्र वाढले; शेतकरी चिंतातुर.

अकोला, दि. ८: मागील एक महिन्यापासून विदर्भात सारखा पाऊस सुरू असल्याने पिकांची वाढ खुंटली असून, तण मात्र पिकांच्या वर गेल्याने शेतकरी चिंतातुर आहे; पण दोन दिवसांपासून पावसाने अल्पशी उसंत देताच शेतकर्‍यांनी पिकांच्या आंतरमशागतीला सुरुवात केली आहे. तब्बल एक महिन्यानंतर शेतातील तण काढण्यासाठी सर्वत्र निंदणाची कामे होत आहेत. परिणामी ग्रामीण भागातील महिला, मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.विदर्भात जवळपास ५0 लाख हेक्टर क्षेत्रफळ खरिपाचे आहे. पश्‍चिम विदर्भात यातील ३२ लाख हेक्टर क्षेत्र विविध खरीप पिकाखाली आहे. यामध्ये सोयाबीन सर्वाधिक १३ लाख हेक्टर आहे. त्या खालोखाल ८ लाख हेक्टर क्षेत्र कापूस, ४ लाख ९0 हजार हेक्टर तूर व उर्वरित इतर तृण व गळित धान्याची पेरणी झाली आहे; परंतु सतत ४0 दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने सूर्यप्रकाश नाही. परिणामी, पिकांच्या मुळांना प्राणवायू मिळाला नसल्याने पिके पिवळी पडत आहेत. सर्वाधिक नुकसान तूर या पिकाचे झाले आहे. मूग पिकावर रोग आला असून, सोयाबीनवर केसाळ अळी, हिरवी उंटअळी, मुळकूज, खुळकूज रोग आला आहे. सततच्या पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रात पाणी साचले आहे. अतवृष्टीने जमीन खरवडून गेल्याने पिक ांचे नुकसान झाले आहे. यावर्षी सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक आहे; परंतु सततच्या पावसामुळे कीड रोगांचा प्रादुर्भाव तर वाढलाच, या पिकांच्या मुळांना प्राणवायू पोहोचत नसल्याने पाने पिवळी पडली आहेत. यावर्षी धाडस करू न शेतकर्‍यांनी ज्वारीची पेरणी केली आहे. ज्वारी हे कमी पावसाचे पीक आहे; परंतु सततच्या पावसामुळे ज्वारी पीकही पिवळे पडले आहे. विशेष म्हणजे पावसामुळे तण वाढले असून, हे तण पिकांच्या वर गेल्याने उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे; पण दोन दिवसांपासून पावसाने उसंत देताच शेतकर्‍यांनी आंतरमशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. पावसामुळे शेतीची कामे बंद असल्याने मजुरीवरही परिणाम झाला होता. आता शेतातील तण काढण्यासाठी महिला, मजूर सध्या शेतात दिसत आहे.