शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

पावसाने उसंत देताच मशागत, निंदणाच्या कामाला वेग !

By admin | Updated: August 9, 2016 02:16 IST

विदर्भातील पिकांची वाढ खुंटली; तण मात्र वाढले; शेतकरी चिंतातुर.

अकोला, दि. ८: मागील एक महिन्यापासून विदर्भात सारखा पाऊस सुरू असल्याने पिकांची वाढ खुंटली असून, तण मात्र पिकांच्या वर गेल्याने शेतकरी चिंतातुर आहे; पण दोन दिवसांपासून पावसाने अल्पशी उसंत देताच शेतकर्‍यांनी पिकांच्या आंतरमशागतीला सुरुवात केली आहे. तब्बल एक महिन्यानंतर शेतातील तण काढण्यासाठी सर्वत्र निंदणाची कामे होत आहेत. परिणामी ग्रामीण भागातील महिला, मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.विदर्भात जवळपास ५0 लाख हेक्टर क्षेत्रफळ खरिपाचे आहे. पश्‍चिम विदर्भात यातील ३२ लाख हेक्टर क्षेत्र विविध खरीप पिकाखाली आहे. यामध्ये सोयाबीन सर्वाधिक १३ लाख हेक्टर आहे. त्या खालोखाल ८ लाख हेक्टर क्षेत्र कापूस, ४ लाख ९0 हजार हेक्टर तूर व उर्वरित इतर तृण व गळित धान्याची पेरणी झाली आहे; परंतु सतत ४0 दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने सूर्यप्रकाश नाही. परिणामी, पिकांच्या मुळांना प्राणवायू मिळाला नसल्याने पिके पिवळी पडत आहेत. सर्वाधिक नुकसान तूर या पिकाचे झाले आहे. मूग पिकावर रोग आला असून, सोयाबीनवर केसाळ अळी, हिरवी उंटअळी, मुळकूज, खुळकूज रोग आला आहे. सततच्या पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रात पाणी साचले आहे. अतवृष्टीने जमीन खरवडून गेल्याने पिक ांचे नुकसान झाले आहे. यावर्षी सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक आहे; परंतु सततच्या पावसामुळे कीड रोगांचा प्रादुर्भाव तर वाढलाच, या पिकांच्या मुळांना प्राणवायू पोहोचत नसल्याने पाने पिवळी पडली आहेत. यावर्षी धाडस करू न शेतकर्‍यांनी ज्वारीची पेरणी केली आहे. ज्वारी हे कमी पावसाचे पीक आहे; परंतु सततच्या पावसामुळे ज्वारी पीकही पिवळे पडले आहे. विशेष म्हणजे पावसामुळे तण वाढले असून, हे तण पिकांच्या वर गेल्याने उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे; पण दोन दिवसांपासून पावसाने उसंत देताच शेतकर्‍यांनी आंतरमशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. पावसामुळे शेतीची कामे बंद असल्याने मजुरीवरही परिणाम झाला होता. आता शेतातील तण काढण्यासाठी महिला, मजूर सध्या शेतात दिसत आहे.