शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे कळंबोलीत बत्ती गुल

By admin | Updated: June 14, 2017 03:15 IST

इन्फ्राच्या माध्यमातून कोट्यवधींची कामे करूनही पनवेल परिसरातील वीज वितरणचे व्यवस्थापन पहिल्याच पावसात फोल ठरले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

कळंबोली : इन्फ्राच्या माध्यमातून कोट्यवधींची कामे करूनही पनवेल परिसरातील वीज वितरणचे व्यवस्थापन पहिल्याच पावसात फोल ठरले आहे. सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसात कळंबोलीतील महावितरणची यंत्रणा कोलमडून पडली. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत बहुतांश भागातील वीज गायब झाली, तर मंगळवारी सकाळी तीन तास बत्ती गुल होती. त्यामुळे कळंबोलीकरांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. सिडको वसाहतीत दिवसागणिक लोकवस्ती वाढत चालली आहे. त्याच प्रमाण वीजजोडण्यांची संख्या वाढत आहे. ग्राहकांच्या वाढत्या संख्येच्या विचार करता अनेक सुधारणा अपेक्षित असताना त्या केवळ कागदावरच आहेत. त्याचबरोबर एखाद्या वेळी वीजपुरवठा खंडित झाला तरी त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करणे क्रमप्राप्त आहे. सिडको वसाहतीत वीजगळती व थकबाकीचे प्रमाण कमी आहे. मात्र तरीही नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळत नाही. बत्ती गुल होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत रहावा याकरिता महावितरणने विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. मान्सूनपूर्व कामांसाठी उन्हाळ्यात पनवेल परिसरात दिवसभर शटडाऊन घेतला जात होता. मंगळवार तर महावितरणचा दुरूस्तीचा हक्काचा वार त्याचबरोबर मान्सूनपूर्व कामाच्या नावाखाली ग्राहकांना घामाघूम केले जात होते. मात्र त्याचा काही फायदा झाला नसल्याची प्रचिती सोमवारी कळंबोलीतील वीजग्राहकांना आली. या नोडमध्ये रात्री नऊ वाजता वीजपुरवठा खंडित झाला तो मध्यरात्री सुरळीत झाला. मंगळवारीही सकाळी साडेसहा वाजता गुल झालेली बत्ती दहा वाजता पूर्ववत झाली. यामुळे रहिवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. यासंदर्भात सहाय्यक कार्यकारी अभियंता ए. व्ही. पवार यांच्याशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही. विजेच्या प्रश्नावर सेना आक्र मकग्राहकांकडून नियमित वीज बिल भरण्याची अपेक्षा केली जाते. त्याचप्रमाणे सुरळीत व अखंडित वीजपुरवठा व्हावा मिळणे त्यांचा हक्क आहे. त्यानुसार योग्य उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी शिवसेनेच्या वतीने पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम यांनी केली आहे, अन्यथा ग्राहकहितवर्धक भूमिका घेवून शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्याची येईल असा इशारा मंगळवारी निकम यांनी दिला. या संदर्भात पक्षाच्या वतीने कळंबोली उपविभागीय कार्यालयात पत्र देण्यात आले.