शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

शेतमाल खरेदीलाही आधार सक्ती?

By admin | Updated: March 29, 2017 01:03 IST

व्यापाऱ्यांचा जावईशोध : बिलांसाठी शेतकऱ्यांकडे ‘आधार’च्या झेरॉक्सची मागणी

चंद्रकांत कित्तुरे -- कोल्हापूर --बॅँक खाते, शासकीय लाभाच्या योजना तसेच सरकारी दाखले अथवा कागदपत्रे मिळविण्यासाठी आधार कार्ड लागते. मात्र, शेतमाल खरेदी केल्यानंतर त्याचे बिल बँकेत जमा करण्यासाठीही आधार कार्ड लागत असल्याचा जावईशोध सांगली जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी लावला आहे. शेतकऱ्यांकडून ते आधार कार्ड आणि बॅँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत घेत आहेत.कॅशलेसच्या दिशेने जाण्यासाठी केंद्र सरकारने रोखीच्या व्यवहारांवर अनेक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे व्यापारी आता शेतमाल खरेदी केल्यानंतर त्याचे बिल धनादेशाने देत आहेत अथवा आरटीजीएसद्वारे शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यात भरत आहेत. मात्र, आरटीजीएस करण्यासाठी ते शेतकऱ्यांकडून बॅँक पासबुक आणि आधार कार्डाची झेरॉक्स प्रत घेत आहेत. सांगली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून हा प्रकार सुरू असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जाते.याबाबत मिरज तालुक्यातील आरग येथील एका व्यापाऱ्याला विचारले असता तो म्हणाला, ‘तुम्ही शेतकरीच आहात की नाही याची खातरजमा करण्यासाठी बँकांना हीे आधार कार्डची झेरॉक्स द्यावी लागते. आम्ही बँकेत पैसे भरल्यानंतर तुमच्या बॅँकेत संबंधित बँकेचे कर्मचारी तुम्ही शेतकरी आहात की नाही याची खातरजमा करतात आणि मगच पैसे तुमच्या खात्यावर जमा करतात.’यावर तसा नियम नाही. आधार कार्डाशिवाय बँका खातेच उघडून देत नाहीत. मग पुन्हा तुमच्याकडे आधारची झेरॉक्स का द्यावयाची, असे विचारता सगळेच व्यापारी घेत आहेत, ते द्यावेच लागते, असे त्याचे म्हणणे होते. प्राप्तिकर खात्याच्या धसक्याने मागणीआपण खरेदी केलेला शेतमाल हा शेतकऱ्याचाच आहे याचा पुरावा प्राप्तिकर अधिकाऱ्यांना देता यावा यासाठी व्यापारी शेतकऱ्याकडे आधारची मागणी करीत असल्याचे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील आणखी एका व्यापाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. एखादा शेतकरी मोठ्या प्रमाणात धान्य घेऊन मार्केटमध्ये आला तर तो शेतकरीच आहे का याची खातरजमा करण्यासाठी, तसेच उद्या प्राप्तिकर चौकशी लागलीच तर पुरावा आपल्याकडे असावा यासाठी शेतकऱ्याकडे बॅँक पासबुक आणि आधार कार्डच्या झेरॉक्सची मागणी करीत आहेत, असेही त्याने सांगितले.कृती नियमबाह्ययाबाबत सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील यांना विचारले असता तसा कोणताही नियम नाही. शेतकऱ्यांकडून आधार कार्डची झेरॉक्स घेतली जात नाही. कोणी घेत असेल तर ते नियमबाह्य आहे, असे त्यांनी सांगितले.पैसे भरणाऱ्याचेच पॅन कार्ड हवेकोल्हापुरातील बॅँक आॅफ इंडिया बॅँकेचे जिल्हा व्यवस्थापक एस. जी. किनिंगे यांना विचारले असता ते म्हणाले, बँक खात्याची केवायसी करतानाच आधार कार्ड घेतलेले असते. बॅँका कोणत्याही खात्यात पैसे भरताना संबंधित व्यक्ती शेतकरी आहे की आणखी कोण याची चौकशी करीत नाहीत. मोठ्या रकमेसाठी पॅन कार्ड क्रमांक लागतो; पण जो पैसे भरतो त्याचा. ज्याच्या खात्यावर पैसे जमा करावयाचे त्याचे आधार कार्ड किंवा कोणतीही कागदपत्रे लागत नाहीत.