शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

शेतमाल खरेदीलाही आधार सक्ती?

By admin | Updated: March 29, 2017 01:03 IST

व्यापाऱ्यांचा जावईशोध : बिलांसाठी शेतकऱ्यांकडे ‘आधार’च्या झेरॉक्सची मागणी

चंद्रकांत कित्तुरे -- कोल्हापूर --बॅँक खाते, शासकीय लाभाच्या योजना तसेच सरकारी दाखले अथवा कागदपत्रे मिळविण्यासाठी आधार कार्ड लागते. मात्र, शेतमाल खरेदी केल्यानंतर त्याचे बिल बँकेत जमा करण्यासाठीही आधार कार्ड लागत असल्याचा जावईशोध सांगली जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी लावला आहे. शेतकऱ्यांकडून ते आधार कार्ड आणि बॅँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत घेत आहेत.कॅशलेसच्या दिशेने जाण्यासाठी केंद्र सरकारने रोखीच्या व्यवहारांवर अनेक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे व्यापारी आता शेतमाल खरेदी केल्यानंतर त्याचे बिल धनादेशाने देत आहेत अथवा आरटीजीएसद्वारे शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यात भरत आहेत. मात्र, आरटीजीएस करण्यासाठी ते शेतकऱ्यांकडून बॅँक पासबुक आणि आधार कार्डाची झेरॉक्स प्रत घेत आहेत. सांगली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून हा प्रकार सुरू असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जाते.याबाबत मिरज तालुक्यातील आरग येथील एका व्यापाऱ्याला विचारले असता तो म्हणाला, ‘तुम्ही शेतकरीच आहात की नाही याची खातरजमा करण्यासाठी बँकांना हीे आधार कार्डची झेरॉक्स द्यावी लागते. आम्ही बँकेत पैसे भरल्यानंतर तुमच्या बॅँकेत संबंधित बँकेचे कर्मचारी तुम्ही शेतकरी आहात की नाही याची खातरजमा करतात आणि मगच पैसे तुमच्या खात्यावर जमा करतात.’यावर तसा नियम नाही. आधार कार्डाशिवाय बँका खातेच उघडून देत नाहीत. मग पुन्हा तुमच्याकडे आधारची झेरॉक्स का द्यावयाची, असे विचारता सगळेच व्यापारी घेत आहेत, ते द्यावेच लागते, असे त्याचे म्हणणे होते. प्राप्तिकर खात्याच्या धसक्याने मागणीआपण खरेदी केलेला शेतमाल हा शेतकऱ्याचाच आहे याचा पुरावा प्राप्तिकर अधिकाऱ्यांना देता यावा यासाठी व्यापारी शेतकऱ्याकडे आधारची मागणी करीत असल्याचे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील आणखी एका व्यापाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. एखादा शेतकरी मोठ्या प्रमाणात धान्य घेऊन मार्केटमध्ये आला तर तो शेतकरीच आहे का याची खातरजमा करण्यासाठी, तसेच उद्या प्राप्तिकर चौकशी लागलीच तर पुरावा आपल्याकडे असावा यासाठी शेतकऱ्याकडे बॅँक पासबुक आणि आधार कार्डच्या झेरॉक्सची मागणी करीत आहेत, असेही त्याने सांगितले.कृती नियमबाह्ययाबाबत सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील यांना विचारले असता तसा कोणताही नियम नाही. शेतकऱ्यांकडून आधार कार्डची झेरॉक्स घेतली जात नाही. कोणी घेत असेल तर ते नियमबाह्य आहे, असे त्यांनी सांगितले.पैसे भरणाऱ्याचेच पॅन कार्ड हवेकोल्हापुरातील बॅँक आॅफ इंडिया बॅँकेचे जिल्हा व्यवस्थापक एस. जी. किनिंगे यांना विचारले असता ते म्हणाले, बँक खात्याची केवायसी करतानाच आधार कार्ड घेतलेले असते. बॅँका कोणत्याही खात्यात पैसे भरताना संबंधित व्यक्ती शेतकरी आहे की आणखी कोण याची चौकशी करीत नाहीत. मोठ्या रकमेसाठी पॅन कार्ड क्रमांक लागतो; पण जो पैसे भरतो त्याचा. ज्याच्या खात्यावर पैसे जमा करावयाचे त्याचे आधार कार्ड किंवा कोणतीही कागदपत्रे लागत नाहीत.