शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतमाल खरेदीलाही आधार सक्ती?

By admin | Updated: March 29, 2017 01:03 IST

व्यापाऱ्यांचा जावईशोध : बिलांसाठी शेतकऱ्यांकडे ‘आधार’च्या झेरॉक्सची मागणी

चंद्रकांत कित्तुरे -- कोल्हापूर --बॅँक खाते, शासकीय लाभाच्या योजना तसेच सरकारी दाखले अथवा कागदपत्रे मिळविण्यासाठी आधार कार्ड लागते. मात्र, शेतमाल खरेदी केल्यानंतर त्याचे बिल बँकेत जमा करण्यासाठीही आधार कार्ड लागत असल्याचा जावईशोध सांगली जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी लावला आहे. शेतकऱ्यांकडून ते आधार कार्ड आणि बॅँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत घेत आहेत.कॅशलेसच्या दिशेने जाण्यासाठी केंद्र सरकारने रोखीच्या व्यवहारांवर अनेक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे व्यापारी आता शेतमाल खरेदी केल्यानंतर त्याचे बिल धनादेशाने देत आहेत अथवा आरटीजीएसद्वारे शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यात भरत आहेत. मात्र, आरटीजीएस करण्यासाठी ते शेतकऱ्यांकडून बॅँक पासबुक आणि आधार कार्डाची झेरॉक्स प्रत घेत आहेत. सांगली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून हा प्रकार सुरू असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जाते.याबाबत मिरज तालुक्यातील आरग येथील एका व्यापाऱ्याला विचारले असता तो म्हणाला, ‘तुम्ही शेतकरीच आहात की नाही याची खातरजमा करण्यासाठी बँकांना हीे आधार कार्डची झेरॉक्स द्यावी लागते. आम्ही बँकेत पैसे भरल्यानंतर तुमच्या बॅँकेत संबंधित बँकेचे कर्मचारी तुम्ही शेतकरी आहात की नाही याची खातरजमा करतात आणि मगच पैसे तुमच्या खात्यावर जमा करतात.’यावर तसा नियम नाही. आधार कार्डाशिवाय बँका खातेच उघडून देत नाहीत. मग पुन्हा तुमच्याकडे आधारची झेरॉक्स का द्यावयाची, असे विचारता सगळेच व्यापारी घेत आहेत, ते द्यावेच लागते, असे त्याचे म्हणणे होते. प्राप्तिकर खात्याच्या धसक्याने मागणीआपण खरेदी केलेला शेतमाल हा शेतकऱ्याचाच आहे याचा पुरावा प्राप्तिकर अधिकाऱ्यांना देता यावा यासाठी व्यापारी शेतकऱ्याकडे आधारची मागणी करीत असल्याचे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील आणखी एका व्यापाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. एखादा शेतकरी मोठ्या प्रमाणात धान्य घेऊन मार्केटमध्ये आला तर तो शेतकरीच आहे का याची खातरजमा करण्यासाठी, तसेच उद्या प्राप्तिकर चौकशी लागलीच तर पुरावा आपल्याकडे असावा यासाठी शेतकऱ्याकडे बॅँक पासबुक आणि आधार कार्डच्या झेरॉक्सची मागणी करीत आहेत, असेही त्याने सांगितले.कृती नियमबाह्ययाबाबत सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील यांना विचारले असता तसा कोणताही नियम नाही. शेतकऱ्यांकडून आधार कार्डची झेरॉक्स घेतली जात नाही. कोणी घेत असेल तर ते नियमबाह्य आहे, असे त्यांनी सांगितले.पैसे भरणाऱ्याचेच पॅन कार्ड हवेकोल्हापुरातील बॅँक आॅफ इंडिया बॅँकेचे जिल्हा व्यवस्थापक एस. जी. किनिंगे यांना विचारले असता ते म्हणाले, बँक खात्याची केवायसी करतानाच आधार कार्ड घेतलेले असते. बॅँका कोणत्याही खात्यात पैसे भरताना संबंधित व्यक्ती शेतकरी आहे की आणखी कोण याची चौकशी करीत नाहीत. मोठ्या रकमेसाठी पॅन कार्ड क्रमांक लागतो; पण जो पैसे भरतो त्याचा. ज्याच्या खात्यावर पैसे जमा करावयाचे त्याचे आधार कार्ड किंवा कोणतीही कागदपत्रे लागत नाहीत.