शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 02:04 IST

वाकड-काळाखडक रस्त्याची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती न झाल्यामुळे, पावसाळ्यात या रस्त्याची अधिकच दुरवस्था झाली आहे.

वाकड : वाकड-काळाखडक रस्त्याची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती न झाल्यामुळे, पावसाळ्यात या रस्त्याची अधिकच दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमधून वाहन काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बहुतांश वाहनधारक खड्डे चुकवून वाहन काढत असल्यामुळे, या रस्त्यावर वाहतूककोंडी देखील होत आहे. आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहतूककोंडीची समस्या उद्भवत असल्यामुळे, या ठिकाणी अपघाताचीदेखील शक्यता निर्माण झाली आहे.थेरगावहून वाकडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कलाटेनगरजवळील वाकड ते काळाखडक या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. वाकड रस्त्यावरून काळाखडककडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीलाच ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर हे खड्डे अधिकच मोठे झाले असून, खड्ड्यातील दगड-गोटे रस्त्यावर येऊन इतरत्र पसरले आहेत. या बारीक दगड-गोट्यांमुळे वाहनांचे टायर पंक्चर होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. रात्रीच्या सुमारास तर खड्ड्यांचा अंदाज लक्षात येत नसल्यामुळे वाहनधारक संथ गतीने वाहन चालवत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. या रस्त्याशेजारी मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असून, या वाहतूककोंडीमुळे रहिवाशांना रस्ता ओलांडणेदेखील अवघड झाले आहे. यामुळे किरकोळ अपघाताचीदेखील शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात तर या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, या खड्ड्यांमध्ये पाणी व काडी-कचरा साचून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तर खड्ड्यांमुळे वाहनांचेदेखील नुकसान होत आहे. (वार्ताहर)>दर वर्षी महापालिका प्रशासनातर्फे पावसाळ्यापूर्वी एप्रिल-मे महिन्यात या रस्त्याची डांबर टाकून दुरूस्ती केली जाते. मात्र, यंदा या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नसून, खड्ड्यांची साधी डागडुजीदेखील करण्यात आलेली नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होऊन, रस्त्यांत खड्डे की खड्डयांत रस्ते, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण आहे. प्रशासनाने सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत वर्दळ असलेल्या या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी रहिवाशी व वाहनधारकांतर्फे करण्यात येत आहे.