शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख...
2
सुरक्षा दलाचे सर्वांत मोठे यश ! ५०० जवानांचा बळी घेणारा जहाल नक्षल कमांडर 'हिडमा'चा खात्मा ; १० कोटींचे होते इनाम
3
"...याची जाणीव ठेवणं गरजेचं होतं"; ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसने सुनावले, अग्रलेखाला सणसणीत उत्तर
4
चौकशीत आरोपी डॉक्टरांचे मोठे खुलासे; सिग्नल App चा वापर, i-20 ची खरेदी अन्..., अनेक गोष्टी झाल्या उघड
5
VIRAL : आयुष्यातील पहिलीच नोकरी अन् अवघ्या तीन तासांनंतरच दिला राजीनामा! असं नेमकं झालं काय? 
6
Shiv Sena BJP: "थोडी नाराजी तयार झाली असेल, पण आजच्या..."; शिंदेंचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चेवर बावनकुळे काय म्हणाले?
7
मुंबईकरांची धावपळ! शहरात CNG पुरवठा अचानक ठप्प; ऑटो-टॅक्सीची लांबच लांब रांग, कधीपर्यंत दुरुस्त होणार?
8
"मी तशी नाही…" वादग्रस्त प्रकरणावर व्यक्त होताना बांगलादेशी कर्णधाराने घेतलं हरमनप्रीतचं नाव
9
रेखा झुनझुनवालांनी 'या' बँकेतील हिस्सा वाढवला, शेअर्सनं गाठला नवा उच्चांक; किंमत २४५ रुपयांच्या पार
10
Mumbai Traffic: एलबीएस मार्गावर आता 'गेम चेंजर' पूल; ४० मिनिटांचे अंतर अवघ्या १० मिनिटांत पार होणार!
11
Mumbai Indians मधून बाहेर पडताच Arjun Tendulkar ची धडाकेबाज कामगिरी, साकारलं अनोखं शतक
12
Stray Dogs: लाखभर भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्रे उभारणार कुठे? पालिकेसमोर मोठे आव्हान
13
SIP मध्ये 'ही' चूक कराल तर मोठं नुकसान! फक्त ३ पेमेंट मिस झाल्यास १.५ लाख रुपये बुडतील; पाहा गणित
14
Stock Market Bull Run: तयार राहा! शेअर बाजारात येणार आणखी एक बूल रन; सेन्सेक्स पोहोचणार १,०७,००० पर्यंत?
15
‘साधी एक चिपही बनवता येत नाही, अमेरिकन नागरिक काय कामाचे?’, डोनाल्ड ट्रम्प संतापले, ‘या’ देशाकडून शिकण्याचा दिला सल्ला 
16
अमित शाहांनी दिलेली 30 नोव्हेंबरची डेडलाइन; त्यापूर्वीच सुरक्षा दलांनी हिडमाला संपवले..!
17
आधी बोगस डॉक्टर, नंतर जादूटोण्यावर ठेवला विश्वास; तापाने फणफणलेल्या ३ मुलांनी गमावला जीव
18
Vegetable Rates: भाजीपाल्याने गाठली शंभरी; गवार १६०, मटार १३० रुपये किलो!
19
भारताचा मध्यमवर्ग संकटाच्या उंबरठ्यावर; २ कोटी लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका
20
त्याच्या चेहऱ्यावर ना पश्चात्ताप ना कसली चिंता; दिल्ली स्फोटातील आरोपीला भेटल्यानंतर वकील म्हणाले.. 
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंगात लिहिलेल्या कवितांमुळे खुनी ज्ञानेश्वरचा फास सुटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 06:14 IST

सर्वोच्च न्यायालयाने दाखवली दया : माणुसकीची लक्षणे दिसल्याने दिली जन्मठेप

- अजित गोगटे।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तुरुंगात लिहिलेल्या कवितांमुळे फाशीऐवजी जन्मठेप ठोठावून ज्ञानेश्वर सुरेश बोरकर या गुन्हेगाराला सर्वोच्च न्यायालयाने जीवदान दिले आहे. पुणे जिल्ह्यातील सासवड येथील एका डॉक्टर दाम्पत्याच्या १३ वर्षांच्या मुलाचे पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून खून केल्याबद्दल त्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली होती.

सासवड येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अशोक माईणकर व नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी या दाम्पत्याच्या हृषिकेश या मुलाचा खून केल्याबद्दल पुण्याच्या सत्र न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने आॅगस्ट २००५ मध्ये कायम केली होती. याविरुद्ध ज्ञानेश्वरने केलेले अपील गेली १५ वर्षे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होते. न्या. ए. के. सिक्री, न्या. एस. अबुल नझीर व न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने ज्ञानेश्वरची फाशी रद्द करून त्याला जन्मठेप दिली. या शिक्षेत सवलत मिळण्यासाठी तो राज्य सरकारकडे अर्ज करू शकेल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. ज्ञानेश्वरच्या वतीने ज्येष्ठ वकील कॉलिन गोन्साल्विस यांनी खुनाबद्दल दोषी ठरविण्याचा निर्णय मान्य केला. मात्र फाशी का दिले जाऊ नये, एवढेच मुद्दे मांडले. सरकारतर्फे अ‍ॅड. दीपा कुलकर्णी यांनी त्याला जराही दया दाखवू नये, असा आग्रह धरला.डॉक्टरांचे कुटुंब उद््ध्वस्तडॉ. माईणकर दाम्पत्यास ऋता व हृषिकेश अशी दोन अपत्ये होती. खून झाला तेव्हा हृषिकेश १३, तर ऋता १४ वर्षांची होती. भावाचा खून झाल्याच्या धक्क्यातून ऋता बाहेर आली नाही. सन २००३मध्ये तिने आत्महत्या केली. आता साठीकडे झुकलेल्या डॉ. अशोक विषण्ण मनोवृत्तीत आहेत. डॉ. अश्विनीही हताश आहेत. ज्ञानेश्वरची आई विधवा आहे व तिचा हा मोठा मुलगा आहे, याचा न्यायालयाने विचार केला. पण न्यायालयाच्या या दयाबुद्धीने या डॉक्टर दाम्पत्याच्या दोन्ही अपत्ये गमावण्याच्या कधीही न भरून निघणाऱ्या दु:खावर फुंकर घातली जाईल की डागण्या दिल्या जातील, हे सांगणे कठीण आहे.फाशी रद्द करताना विचारात घेतलेले मुद्देगुन्हा केला तेव्हा ज्ञानेश्वर २२-२३ वर्षांचा होता.च्त्याने १८ वर्षांचा तुरुंगवास भोगलाच्तुरुंगात त्याची वागणूक चांगली होती. तुरुंगातच तो बीए झाला व त्याने गांधीवादी विचारांचा अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.च्त्याने तुरुंगात केलेल्या कवितांतून त्याला चूक उमगल्याचे दिसून येते.च्तो सुधारू शकतो व त्याचे पुनर्वसनही होऊ शकते. तो एक चांगला नागरिक म्हणून समाजात पुन्हा वावरू शकतो.च्तो पुन्हा तसाच गुन्हा करण्याची शक्यता नाही व त्याच्यापासून समाजास धोकाही नाही.