शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वैद्यकीय सेवा न मिळाल्यामुळे मातेसह बालकाचा मृत्यू,आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर;मेळघाटातील घटना                            

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 18:15 IST

मेळघाटमधील राणीगाव आरोग्य उपकेंद्रांतर्गत येणा-या कंजोली येथील सविता दीपक सावलकर यांचा प्रसुतीसाठी कोणतीही वैद्यकीय सेवा वेळेवर उपलब्ध न झाल्याने नवजात बालकासह मृत्यू झाला.

पंकज लायदे अमरावती, दि. 24 - मेळघाटमधील राणीगाव आरोग्य उपकेंद्रांतर्गत येणा-या कंजोली येथील सविता दीपक सावलकर यांचा प्रसुतीसाठी कोणतीही वैद्यकीय सेवा वेळेवर उपलब्ध न झाल्याने नवजात बालकासह मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून मेळघाटातील माता व बालमृत्यूचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून आरोेग्य विभागाची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली आहेत.

प्राप्त माहितीनुसार, राणीगाव ग्रामपंचायतीअंतर्गत एक मोबाईल आरोग्य पथक असून त्यांना पाच गावांमध्ये वैद्यकीय सेवा पुरविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये राणीगाव, सिनबंद, कंजोली, मोथाखेडा व गोलाई या गावांचा समावेश आहे. या आरोग्य पथकात वैद्यकीय अधिकारीच नाही. फिरत्या पथकातील आरोग्य अधिका-यांना प्रतिनियुक्तीवर बैरागड येथे पाठविल्याने ही ५ गावे वैद्यकीय सेवेपासून वंचित आहेत. परिणामी कंजोली येथे माता व बालमृत्यूची घटना घडली. 

याठिकाणी गर्भवती महिलांची वेळेवर तपासणी केली जात नाही, त्यांना वेळेवर औषधोपचारही मिळत नाही. वैद्यकीय अधिकारीच नसल्याने प्रसूतीचा प्रश्नच येत नाही. यामुळेच सविता सावलकर हिचा मृत्यू झाला. सविताला २३ आॅगस्टच्या मध्यरात्री प्रसूतीवेदना सुरू झाल्यात. डॉक्टर आणि संदर्भसेवादेखील प्राप्त न झाल्याने घरीच तिचा उपचाराअभावी मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या नाकर्तेपणामुळे एका मातेसह व नवजाताचा जीव गेल्याने गावकरी संताप व्यक्त करीत आहेत. एकीकडे आरोग्यमंत्री मेलघाटात येऊन उत्तम आरोग्यसेवा देण्याचा दावा करतात, तर दुसरीकडे मेळघाटात आरोग्यसेवा न मिळाल्याने माता व बालमृत्यू होताहेत. यासाठी जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.     

१५ आॅगस्टच्या ग्रामसभेत निवासी डॉक्टर नसल्याचा ठराव घेण्यात आला होता. त्या ठरावासह निवेदनसुद्धा आरोग्य विभागाला देण्यात आले होते. परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्याने बाल व मातामृत्यूची ही घटना घडली. - लक्ष्मण भिलावेकर,सदस्य, ग्रामपंचायत, राणीगाव