शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

निसर्गानं दिलेल्या धोक्याच्या सूचनेमुळे शाश्वत विकासासाठी नद्या वाचवण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 06:14 IST

बेसुमार वृक्षतोड आणि नद्यांबाबत असणा-या बेफिकीर वृत्तीमुळे आपण आपल्याच भावी पिढ्यांना संकटात टाकत आहोत. निसर्गाने वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला धोक्याचा इशारा दिला आहे. वेळीच हा इशारा ओळखून सर्वांनी एकत्रितपणे नद्यांचे रक्षण तसेच वृक्षलागवड व संगोपनाचे कार्य गांभीर्याने घेण्याची आवश्यकता असल्याची भावना राज्यपाल विद्यासागर राव यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतरत्न सचिन तेंडुलकर आदींनी रविवारी व्यक्त केली.

मुंबई : बेसुमार वृक्षतोड आणि नद्यांबाबत असणा-या बेफिकीर वृत्तीमुळे आपण आपल्याच भावी पिढ्यांना संकटात टाकत आहोत. निसर्गाने वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला धोक्याचा इशारा दिला आहे. वेळीच हा इशारा ओळखून सर्वांनी एकत्रितपणे नद्यांचे रक्षण तसेच वृक्षलागवड व संगोपनाचे कार्य गांभीर्याने घेण्याची आवश्यकता असल्याची भावना राज्यपाल विद्यासागर राव यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतरत्न सचिन तेंडुलकर आदींनी रविवारी व्यक्त केली.ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या नेतृत्वाखाली ‘रॅली फॉर रिव्हर’ आणि महाराष्ट्राच्या वृक्षलागवड मोहिमेचा कार्यक्रम राजभवन येथील जलविहार सभागृहात पार पडला. या वेळी जग्गी वासुदेव, अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री राजे अंबरीशराव अत्राम, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यांच्यासह राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.नद्या या आपल्या जीवनवाहिन्या आहेत. मुंबईसारख्या महानगरात आजमितीला पाच नद्या वाहतात, नागपुरातून नाग नदी वाहते, नाशकात गोदावरी आहे तर पुण्यात मुळा-मुठा. दुर्दैवाने या सर्व नद्या आज अक्षरश: नाले बनले आहेत. वेळीच आपण या नद्या वाचविल्या नाहीत तर त्यांच्या काठावरील शहरे आणि गावांचे अस्तित्वच संपून जाईल. स्वच्छ भारत अभियानात नद्यांची स्वच्छता आणि संवर्धन हा महत्त्वाचा भाग असेल. शाश्वत विकासासाठी नद्यांचे रक्षण आणि वृक्षलागवड काळाची गरज बनल्याचे राज्यपाल म्हणाले.तर जग्गी वासुदेव यांनी देशभर ‘रॅली फॉर रिव्हर’ ही मोहीम हाती घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वसुंधरेच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या या उपक्रमात महाराष्ट्र पूर्ण ताकदीने सहभागी होईल. निसर्गरक्षणाचे काम कसोटी क्रिकेटसारखे करून चालणार नाही, तर एकदिवसीय आणि टी-२० सामन्यासारखा विचार व कृती करावी लागेल. वृक्षलागवड मोहिमेच्या माध्यमातून गोदावरी, कृष्णा, नर्मदा आणि तापी आदी नद्यांच्या तीरावरील हिरवळ वाढवून नद्या वाचविण्याचा आमचा उद्देश आहे. येत्या तीन वर्षांत ५० कोटी झाडे लावली जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले.या वेळी सचिन तेंडुलकरनेही भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमासाठी येताना मी वृक्षारोपण करूनच आलो आहे. जेव्हा एखादा रेकॉर्ड तुटतो, तेव्हा आनंद होतो. संघाच्या विजयात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा असतो. सध्या निसर्गही रेकॉर्ड तोडतोय, त्याकडे लक्ष द्यायला हवे. निसर्गसंवर्धनाचे काम आपल्याला सर्वांना एकत्र येऊन करावे लागेल, असे सचिन म्हणाला.