शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

मध्य रेल्वेमार्गावर मेल-एक्स्प्रेस गाड्यांमुळे मनस्ताप

By admin | Updated: December 26, 2015 01:53 IST

मध्य रेल्वेवरील लोकल प्रवाशांना सध्या गर्दीला सामोरे जावे लागत असून, गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.

मुंबई : मध्य रेल्वेवरील लोकल प्रवाशांना सध्या गर्दीला सामोरे जावे लागत असून, गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. मात्र हा प्रयत्न केला जात असतानाच लोकल गाड्यांना होणाऱ्या गर्दीचे आणखी एक कारण पुढे आले आहे. मध्य रेल्वेवर मोठ्या प्रमाणात मेल-एक्स्प्रेस धावत असून, त्यामुळे दररोज २५ लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागत आहे. लेटमार्क लागत असल्याने या लोकल गाड्यांना बरीच गर्दी होत असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. डोंबिवलीकर भावेश नकाते याचा गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. अशा घटना होऊ नयेत यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून एक समितीही नेमण्यात आली. या समितीकडून गर्दीतला प्रवास सुकर करण्याबरोबरच अपघात टाळण्यासाठी सूचना केल्या जाणार आहेत. सध्या या समितीकडून काही सूचना करण्यात आल्या असून, त्यावर रेल्वेकडून अंमलबजावणीही केली जात आहे. तत्पूर्वी लोकलमध्ये गर्दी वाढण्यामागची कारणे रेल्वेकडून शोधली जात असून, यात मध्य रेल्वेमार्गावर मुंबईतून सुटणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या मेल-एक्स्प्रेसमुळे लोकल गाड्यांना चांगलाच लेटमार्क लागत असल्याचे समोर आले आहे. मुंबईतून सुटणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या जवळपास २२0 मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या फेऱ्या आहेत. या मेल-एक्स्प्रेसमुळे दररोज २५ लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागत असल्याचे मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. गर्दीच्या वेळेस फटकालेटमार्क लागणाऱ्यांमध्ये सर्वाधिक गर्दीच्या वेळेत धावणाऱ्या लोकल फेऱ्यांचा समावेश आहे. हा लेटमार्क ५ मिनिटे ते १५ मिनिटांपर्यंतचा आहे.लेटमार्क लागल्याने लोकल गाड्यांना बरीच गर्दी होते. सीएसटी ते कल्याणदरम्यान जलद लोकल गाड्यांना आणि कल्याणपासून पुढे डाऊनला धीम्या व जलद लोकल गाड्यांना लेटमार्क होत असल्याचे सांगण्यात आले.1618लोकल फेऱ्या मध्य रेल्वेमार्गावर होतात. यातील दोन टक्के लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागत आहे. जलद मार्गावरील बदलापूर, अंबरनाथ, कर्जत, कल्याण जलद लोकल गाड्यांना सकाळी व संध्याकाळी गर्दीला सामोरे जावे लागत आहे.