शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

निधीअभावी रखडली ‘जलयुक्त’ची कामे

By admin | Updated: April 30, 2016 00:52 IST

पुरंदर तालुक्यातील २४ गावांतून सुमारे २ हजार २२७ कामांचे प्रस्ताव शासनदरबारी निधीअभावी रखडलेले आहेत.

जेजुरी : पुरंदर तालुक्यातील २४ गावांतून सुमारे २ हजार २२७ कामांचे प्रस्ताव शासनदरबारी निधीअभावी रखडलेले आहेत. यामुळे यावर्षी जलयुक्त शिवारचे एकही काम सुरू होऊ शकलेले नाही. पुरंदर तालुक्यातील पांगारे, शिंदेवाडी-खेंगरेवाडी, घेरापुरंदर, हरणी, पिसुर्टी, आस्करवाडी, भिवरी, वनपुरी, कोडीत बुद्रुक, गराडे, पिंपरी, खानवडी, बेलसर, माळशिरस, नायगाव, कर्नलवाडी, कोळ विहीरे, राख, दौडज, खळद, कोथळे, पिसर्वे, पोंढे, बोऱ्हाळवाडी या २४ गावांतील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुमारे २ हजार २२७ कामे प्रस्तावित आहेत. या कामासाठीचा शासनाच्या लघुपाटबंधारे विभाग वगळता कृषी विभाग ३८ कोटी १५ लाख ५३ हजार रुपये खर्चाची १८५५ कामे, छोटे पाटबंधारे विभागाची ३ कोटी १ लाख ६४ हजार रुपयांची २१ कामे, प्राथमिक पाणीपुरवठा विभाग ३९ लाख ५० हजार रुपयांची १२ कामे, वनविभागाची ५३ लाख १३ हजार रुपयांची २०८ कामे, सामाजिक वनीकरण विभागाची ४४ लाख ५१ हजार रुपये खर्चाची ५३ कामे, जलसंधारण विभागाची २ कोटी २२ लाख ४० हजार रुपयांची १८ कामे आणि भूजल सर्वेक्षणकडून १५ लाख ७२ हजार रुपयांची ६० कामे गृहीत धरून सुमारे ४४ कोटी ९२ लाख ४३ हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या विभागांच्या तालुका प्रशासनाकडून गेल्या डिसेंबर व जानेवारी महिन्यातच या कामांचे प्रस्ताव त्या त्या विभागाच्या जिल्हा प्रशासनाकडे पाठवलेले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून या प्रस्तावित कामांना मंजुरी व निधी उपलब्ध करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केला जातो. मात्र या आराखड्यासाठी अजूनही निधी उपलब्ध झालेला नाही.६७० कामे ठप्प : ११ कोटी २३ लाख रुपयांची प्रतीक्षा>गेल्यावर्षीच्याच विकास आराखड्यातील सुमारे १ हजार ५९० कामांपैकी ६७० कामे अजूनही निधीअभावी रखडलेली आहेत. गेल्यावर्षीच्या ४७ कोटी ५२ लाख ७९ हजार रुपयांच्या आराखड्यातील आतापर्यंत ३२ कोटी १८ लाख ५३ हजार रुपयांचाच निधी मिळू शकला आहे. उर्वरित सुमारे ११ कोटी २३ लाख रुपये निधीची प्रतीक्षा आहे. गेल्यावर्षीचाच निधी उपलब्ध झाला नसतानाही या वर्षीच्या आराखड्यातील कामांची भूमिपूजने घेण्यात आलेली आहेत. भूमिपूजनाचे कार्यक्रम होऊन दोन महिने उलटले तरीही ती कामे अजूनही सुरूच होऊ शकलेली नाहीत. यामुळे जळयुक्त शिवार अभियानांतर्गत कामाबाबत गावागावातून मोठी चर्चा आहे. या वर्षीच्या आराखड्याचा निधी कधी मिळणार व आराखड्यातील किमान भूमिपूजने झालेली कामे तरी पूर्ण होतील का? या संभ्रमात लाभार्थी गावातील गावपुढारी तसेच पदाधिकारी आहेत.