शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी रखडली ‘जलयुक्त’ची कामे

By admin | Updated: April 30, 2016 00:52 IST

पुरंदर तालुक्यातील २४ गावांतून सुमारे २ हजार २२७ कामांचे प्रस्ताव शासनदरबारी निधीअभावी रखडलेले आहेत.

जेजुरी : पुरंदर तालुक्यातील २४ गावांतून सुमारे २ हजार २२७ कामांचे प्रस्ताव शासनदरबारी निधीअभावी रखडलेले आहेत. यामुळे यावर्षी जलयुक्त शिवारचे एकही काम सुरू होऊ शकलेले नाही. पुरंदर तालुक्यातील पांगारे, शिंदेवाडी-खेंगरेवाडी, घेरापुरंदर, हरणी, पिसुर्टी, आस्करवाडी, भिवरी, वनपुरी, कोडीत बुद्रुक, गराडे, पिंपरी, खानवडी, बेलसर, माळशिरस, नायगाव, कर्नलवाडी, कोळ विहीरे, राख, दौडज, खळद, कोथळे, पिसर्वे, पोंढे, बोऱ्हाळवाडी या २४ गावांतील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुमारे २ हजार २२७ कामे प्रस्तावित आहेत. या कामासाठीचा शासनाच्या लघुपाटबंधारे विभाग वगळता कृषी विभाग ३८ कोटी १५ लाख ५३ हजार रुपये खर्चाची १८५५ कामे, छोटे पाटबंधारे विभागाची ३ कोटी १ लाख ६४ हजार रुपयांची २१ कामे, प्राथमिक पाणीपुरवठा विभाग ३९ लाख ५० हजार रुपयांची १२ कामे, वनविभागाची ५३ लाख १३ हजार रुपयांची २०८ कामे, सामाजिक वनीकरण विभागाची ४४ लाख ५१ हजार रुपये खर्चाची ५३ कामे, जलसंधारण विभागाची २ कोटी २२ लाख ४० हजार रुपयांची १८ कामे आणि भूजल सर्वेक्षणकडून १५ लाख ७२ हजार रुपयांची ६० कामे गृहीत धरून सुमारे ४४ कोटी ९२ लाख ४३ हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या विभागांच्या तालुका प्रशासनाकडून गेल्या डिसेंबर व जानेवारी महिन्यातच या कामांचे प्रस्ताव त्या त्या विभागाच्या जिल्हा प्रशासनाकडे पाठवलेले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून या प्रस्तावित कामांना मंजुरी व निधी उपलब्ध करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केला जातो. मात्र या आराखड्यासाठी अजूनही निधी उपलब्ध झालेला नाही.६७० कामे ठप्प : ११ कोटी २३ लाख रुपयांची प्रतीक्षा>गेल्यावर्षीच्याच विकास आराखड्यातील सुमारे १ हजार ५९० कामांपैकी ६७० कामे अजूनही निधीअभावी रखडलेली आहेत. गेल्यावर्षीच्या ४७ कोटी ५२ लाख ७९ हजार रुपयांच्या आराखड्यातील आतापर्यंत ३२ कोटी १८ लाख ५३ हजार रुपयांचाच निधी मिळू शकला आहे. उर्वरित सुमारे ११ कोटी २३ लाख रुपये निधीची प्रतीक्षा आहे. गेल्यावर्षीचाच निधी उपलब्ध झाला नसतानाही या वर्षीच्या आराखड्यातील कामांची भूमिपूजने घेण्यात आलेली आहेत. भूमिपूजनाचे कार्यक्रम होऊन दोन महिने उलटले तरीही ती कामे अजूनही सुरूच होऊ शकलेली नाहीत. यामुळे जळयुक्त शिवार अभियानांतर्गत कामाबाबत गावागावातून मोठी चर्चा आहे. या वर्षीच्या आराखड्याचा निधी कधी मिळणार व आराखड्यातील किमान भूमिपूजने झालेली कामे तरी पूर्ण होतील का? या संभ्रमात लाभार्थी गावातील गावपुढारी तसेच पदाधिकारी आहेत.