शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

निधीअभावी एसटीपीचे काम रखडेल

By admin | Updated: June 25, 2016 03:54 IST

नाशिकमधील गोदावरी नदीमध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडण्यात येत असल्याने नदीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. उच्च न्यायालयाने येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) दुरुस्त करण्याचे

मुंबई : नाशिकमधील गोदावरी नदीमध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडण्यात येत असल्याने नदीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. उच्च न्यायालयाने येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) दुरुस्त करण्याचे व नवे बांधण्याचा आदेश वारंवार देऊनही हे काम अद्याप पूर्ण करण्यात आले नाही. राज्य सरकार निधी देत नसल्याने हे काम रखडल्याची सबब नाशिक महापालिकेने उच्च न्यायालयाला दिली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने महापालिकेला किती कालावधीत निधी देणार, अशी विचारणा राज्य सरकारकडे शुक्रवारच्या सुनावणीत केली.नाशिक महापालिका व इचलकरंजी नगर परिषद प्रक्रिया न केलेले सांडपाणी गोदावरी नदीत सोडत असल्याने नदीचे प्रदूषण वाढत आहे. तसेच येथील कारखानेही नदीच्या प्रदूषणात भर घालत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याचे आदेश महापालिका व नगर परिषदेला द्यावे, यासाठी नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडित यांनी अ‍ॅड. प्रवर्तक पाठक यांच्याद्वारे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. यावरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. कोर्टाने एसटीपीचे कामकाज कुठवर आले आहे, अशी विचारणा पालिकेकडे केली. त्यावर पालिकेने सरकारने निधी न दिल्याने नवे एसटीपी बांधण्याचे व जुन्या एसटीपीची क्षमता वाढवण्याचे काम खोळंबल्याचे खंडपीठाला सांगितले. खंडपीठाने किती कालावधीत निधी देण्यात येणार, अशी विचारणा करीत सरकारला ८ जुलैपर्यंत माहिती देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)