शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

आमदारांच्या मध्यस्थीमुळे वीजप्रश्न निकाली

By admin | Updated: August 26, 2016 02:23 IST

वीज कर्मचारी याची दुरुस्ती न करता ग्रामपंचायतच हे काम करेल असे सांगितल्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी यावर नाराजी दर्शवून याला विरोध केला होता

नांदगाव/ मुरुड : मुरुड तालुक्यात २४ ग्रामपंचायती असून वीज मंडळाने ग्रामपंचायत परिसरात असणाऱ्या पोलवरील एखादा बल्ब अथवा ट्यूब खराब अथवा बंद पडल्यास वीज कर्मचारी याची दुरुस्ती न करता ग्रामपंचायतच हे काम करेल असे सांगितल्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी यावर नाराजी दर्शवून याला विरोध केला होता. प्रशिक्षित कर्मचारी नसल्याची व्यथा आ. पंडित पाटील यांच्या पुढे मांडण्यात आली होती. याची दखल घेऊन आमदारांनी हा प्रश्न सोडविला आहे.ग्रामपंचायतीकडे कोणताही प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसल्यामुळे पोलवर चढून दुरु स्तीचे काम करणे फार कठीण होते. याबाबत काही ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींनी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस मनोज भगत यांच्याशी संपर्कसाधून आपली व्यथा मांडली होती. मनोज भगत यांनी हा प्रश्न आमदार पंडित पाटील यांच्याकडे मांडला व ग्रामपंचायतींना दिलासा देण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे आमदार पाटील यांनी बुधवारी वीज मंडळाचे पेण येथील अधीक्षक अभियंता युसूफ शेख यांची कार्यालयात भेट घेऊन ग्रामपंचायतीची बाजू मांडली यावेळी ते म्हणाले की, ग्रामपंचायतीची आर्थिक बाजू सक्षम नसून प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करणे ही कठीण बाब आहे.उंच पोलवर चढणे हे ग्रामपंचायत कर्मचारी यांना जमणारच नाही.वीज मंडळाचे कर्मचारी हे प्रशिक्षित आहेत त्यांचे काम त्यांनाच करून द्यावे. ग्रामपंचायत सर्व सहकार्य करेल परंतु पोलवरची कामे ही वीज कर्मचारी यांनीच केली पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली. यावर अधीक्षक अभियंता युसूफ शेख यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका उपकार्यकारी अभियंता यांना पोलवरील सर्व कामे हे आपलेच कर्मचारी करतील प्रत्येक कर्मचारी यांनी ग्रामपंचायत यांना सहकार्य करावे असे आदेश दिले.या झालेल्या निर्णयामुळे सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी आनंद व्यक्त केला असून आमदार पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.याबाबत आमच्या प्रतिनिधीने मुरुडचे वीज मंडळाचे उप कार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अधीक्षक अभियंता यांचे आदेश प्राप्त झाले असून आमचे वीज कर्मचारी ग्रामपंचायतीस सहकार्य करतील असे सांगितले आहे.(वार्ताहर) >वीजपुरवठा होणार सुरळीतआमदार पंडित पाटील म्हणाले की, मुरु ड शहराचा जो कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे हा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे.कमी दाबाच्या वीज पुरवठ्यापासून मुरु डकरांची कायम मुक्तता होणार असून वीज मंडळाचे कर्मचारी यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे वीज पुरवठा आत्ता सुरळीत होणार आहे असे त्यांनी सांगितले.