शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

आमदारांच्या मध्यस्थीमुळे वीजप्रश्न निकाली

By admin | Updated: August 26, 2016 02:23 IST

वीज कर्मचारी याची दुरुस्ती न करता ग्रामपंचायतच हे काम करेल असे सांगितल्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी यावर नाराजी दर्शवून याला विरोध केला होता

नांदगाव/ मुरुड : मुरुड तालुक्यात २४ ग्रामपंचायती असून वीज मंडळाने ग्रामपंचायत परिसरात असणाऱ्या पोलवरील एखादा बल्ब अथवा ट्यूब खराब अथवा बंद पडल्यास वीज कर्मचारी याची दुरुस्ती न करता ग्रामपंचायतच हे काम करेल असे सांगितल्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी यावर नाराजी दर्शवून याला विरोध केला होता. प्रशिक्षित कर्मचारी नसल्याची व्यथा आ. पंडित पाटील यांच्या पुढे मांडण्यात आली होती. याची दखल घेऊन आमदारांनी हा प्रश्न सोडविला आहे.ग्रामपंचायतीकडे कोणताही प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसल्यामुळे पोलवर चढून दुरु स्तीचे काम करणे फार कठीण होते. याबाबत काही ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींनी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस मनोज भगत यांच्याशी संपर्कसाधून आपली व्यथा मांडली होती. मनोज भगत यांनी हा प्रश्न आमदार पंडित पाटील यांच्याकडे मांडला व ग्रामपंचायतींना दिलासा देण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे आमदार पाटील यांनी बुधवारी वीज मंडळाचे पेण येथील अधीक्षक अभियंता युसूफ शेख यांची कार्यालयात भेट घेऊन ग्रामपंचायतीची बाजू मांडली यावेळी ते म्हणाले की, ग्रामपंचायतीची आर्थिक बाजू सक्षम नसून प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करणे ही कठीण बाब आहे.उंच पोलवर चढणे हे ग्रामपंचायत कर्मचारी यांना जमणारच नाही.वीज मंडळाचे कर्मचारी हे प्रशिक्षित आहेत त्यांचे काम त्यांनाच करून द्यावे. ग्रामपंचायत सर्व सहकार्य करेल परंतु पोलवरची कामे ही वीज कर्मचारी यांनीच केली पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली. यावर अधीक्षक अभियंता युसूफ शेख यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका उपकार्यकारी अभियंता यांना पोलवरील सर्व कामे हे आपलेच कर्मचारी करतील प्रत्येक कर्मचारी यांनी ग्रामपंचायत यांना सहकार्य करावे असे आदेश दिले.या झालेल्या निर्णयामुळे सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी आनंद व्यक्त केला असून आमदार पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.याबाबत आमच्या प्रतिनिधीने मुरुडचे वीज मंडळाचे उप कार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अधीक्षक अभियंता यांचे आदेश प्राप्त झाले असून आमचे वीज कर्मचारी ग्रामपंचायतीस सहकार्य करतील असे सांगितले आहे.(वार्ताहर) >वीजपुरवठा होणार सुरळीतआमदार पंडित पाटील म्हणाले की, मुरु ड शहराचा जो कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे हा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे.कमी दाबाच्या वीज पुरवठ्यापासून मुरु डकरांची कायम मुक्तता होणार असून वीज मंडळाचे कर्मचारी यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे वीज पुरवठा आत्ता सुरळीत होणार आहे असे त्यांनी सांगितले.