शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेल"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
4
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
5
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
6
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
7
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
8
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
9
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
10
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
11
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
12
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
13
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
14
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
15
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
16
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
17
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
18
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
19
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
20
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

मुख्यमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यातील गुन्हेगारी ‘बोकाळली’

By admin | Updated: July 31, 2015 09:29 IST

गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अकार्यक्षमता आणि पोलिसच गुन्हेगारीला संरक्षण देत असल्याने राज्यात गुन्हेगारी बोकाळली असून सरकारचे अस्तित्वच जाणवत नसल्याने कायदा-सुव्यवस्थेचा

मुंबई : गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अकार्यक्षमता आणि पोलिसच गुन्हेगारीला संरक्षण देत असल्याने राज्यात गुन्हेगारी बोकाळली असून सरकारचे अस्तित्वच जाणवत नसल्याने कायदा-सुव्यवस्थेचा धाक संपला आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना पवार म्हणाले की, २५ हजारांच्या हप्त्यासाठी पोलिसांनी मालवणीतील दारूकांडाच्या आरोपींना संरक्षण दिले होते. अशा अधिकाऱ्यांविरुद्ध खुनाचाच गुन्हा दाखल केला पाहिजे. अमली पदार्थांच्या माफिया महिलेशी थेट पोलिसांचे संबंध उघड झाले आहे. आम्ही सत्तेत होतो तेव्हा कायदा-सुव्यवस्थेवरून एकनाथ खडसे आमची लाज काढायचे, आता आम्ही कोणाची लाज काढायची असा बोचरा सवाल पवार यांनी केला. कॉ.गोविंद पानसरे यांचे मारेकरी सापडलेले आहेत पण सरकार माहिती दडवित असल्याचा आरोप होत आहे याकडे लक्ष वेधून अजित पवार म्हणाले की, या हत्येचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचले आहेत याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. आम्ही वारंवार मागणी करूनही आमचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलीस संरक्षण का दिले जात नाही, पानसरे, दाभोलकरांसारखे त्यांचेही बरेवाईट व्हावे, असे तुम्हाला वाटते का, असा सवाल त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)मुख्यमंत्री तटकळलेआषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये पांडुरंगाची पूजा करायला मुख्यमंत्री सपत्नीक गेले तेव्हा त्यांच्या आधी सोलापूरचे कलेक्टर सपत्नीक पूजा करीत असल्याने मुख्यमंत्र्यांना सपत्नीक २० मिनिटे बाहेर ताटकळावे लागले, कलेक्टर पूजा करताहेत तोवर कासवाची पूजा करा, असे मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आल्याचा गौप्यस्फोट अजित पवार यांनी यावेळी केला. ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे त्यावेळी तेथे होते. हा प्रकार पाहून ते इतके संतप्त झाले की तेथून निघून गेले. शेवटी भाऊसाहेब फुंडकरांनी त्यांना मन वळवूनआणले, अशी माहिती देऊन पवार म्हणाले की कलेक्टरनी १२ कोटी जनतेचा अपमान केला आहे.