शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

मुख्यमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यातील गुन्हेगारी ‘बोकाळली’

By admin | Updated: July 31, 2015 09:29 IST

गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अकार्यक्षमता आणि पोलिसच गुन्हेगारीला संरक्षण देत असल्याने राज्यात गुन्हेगारी बोकाळली असून सरकारचे अस्तित्वच जाणवत नसल्याने कायदा-सुव्यवस्थेचा

मुंबई : गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अकार्यक्षमता आणि पोलिसच गुन्हेगारीला संरक्षण देत असल्याने राज्यात गुन्हेगारी बोकाळली असून सरकारचे अस्तित्वच जाणवत नसल्याने कायदा-सुव्यवस्थेचा धाक संपला आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना पवार म्हणाले की, २५ हजारांच्या हप्त्यासाठी पोलिसांनी मालवणीतील दारूकांडाच्या आरोपींना संरक्षण दिले होते. अशा अधिकाऱ्यांविरुद्ध खुनाचाच गुन्हा दाखल केला पाहिजे. अमली पदार्थांच्या माफिया महिलेशी थेट पोलिसांचे संबंध उघड झाले आहे. आम्ही सत्तेत होतो तेव्हा कायदा-सुव्यवस्थेवरून एकनाथ खडसे आमची लाज काढायचे, आता आम्ही कोणाची लाज काढायची असा बोचरा सवाल पवार यांनी केला. कॉ.गोविंद पानसरे यांचे मारेकरी सापडलेले आहेत पण सरकार माहिती दडवित असल्याचा आरोप होत आहे याकडे लक्ष वेधून अजित पवार म्हणाले की, या हत्येचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचले आहेत याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. आम्ही वारंवार मागणी करूनही आमचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलीस संरक्षण का दिले जात नाही, पानसरे, दाभोलकरांसारखे त्यांचेही बरेवाईट व्हावे, असे तुम्हाला वाटते का, असा सवाल त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)मुख्यमंत्री तटकळलेआषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये पांडुरंगाची पूजा करायला मुख्यमंत्री सपत्नीक गेले तेव्हा त्यांच्या आधी सोलापूरचे कलेक्टर सपत्नीक पूजा करीत असल्याने मुख्यमंत्र्यांना सपत्नीक २० मिनिटे बाहेर ताटकळावे लागले, कलेक्टर पूजा करताहेत तोवर कासवाची पूजा करा, असे मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आल्याचा गौप्यस्फोट अजित पवार यांनी यावेळी केला. ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे त्यावेळी तेथे होते. हा प्रकार पाहून ते इतके संतप्त झाले की तेथून निघून गेले. शेवटी भाऊसाहेब फुंडकरांनी त्यांना मन वळवूनआणले, अशी माहिती देऊन पवार म्हणाले की कलेक्टरनी १२ कोटी जनतेचा अपमान केला आहे.