शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

अतिवृष्टीमुळे माळशेज घाटाकडे जाणारा रस्ता खचला, वाहतूक ठप्प

By admin | Updated: July 15, 2017 13:45 IST

माळशेज घाटाकडे जाणार रस्ता खचल्यानं दोन्ही दिशेकडील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे हा रस्ता खचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 15 - माळशेज घाटाकडे जाणार रस्ता खचल्यानं दोन्ही दिशेकडील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे हा रस्ता खचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  मुरबाडहून नगर/जुन्नर आेतूरहून माळशेजकडे जाणारा रस्ता खचला आहे. 
 
रस्ता खचल्यानं माळशेज परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. शिवाय, माळशेज घाटातील वाहतूक बंद असल्याने पुढील 2 ते 3 दिवस चाकण-तळेगाव मार्गावरील रहदारी वाढणार असल्यानं तळेगांव दाभाडे वाहतूक पोलिसांच्याही जबाबदारीत भर पडणार आहे.  
 
माळशेज घाटातील डोंगरकड्यांवरुन पाण्याचे प्रवाह गतीनं वाहणे सुरू झाले आहे. अशावेळी दरडी कोसळण्याची शक्यता असते. शुक्रवारी (14 जुलै ) रात्री राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांशी प्रांत अधिकारी प्रसाद उकार्डे यांनी चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने दोन दिवसांसाठी या घाटावरील दोन्ही बाजूनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार शुक्रवारी रात्रीपासून वाहतूक बंद करण्यात आली आहे. रविवारीदेखील पर्यटक तसेच सर्व वाहनांसाठी घाट बंद राहणार आहे.
 
आणखी बातम्या वाचा
(मुंबईकरांसाठी खूशखबर ! मोडक सागर धरण ओव्हरफ्लो)
(डेंग्यू, मलेरियाला "या" माशांमुळे बसणार आळा)
 
दरड कोसळण्याच्या भीतीमुळे माळशेज घाट 2 दिवस बंद
दरम्यान, ही घटना घडण्यापूर्वीच माळशेज घाटात कोणत्याही क्षणी दरड कोसळण्याची भीती वर्तवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिसांनी पर्यटकांना माळशेज घाटात न जाण्याचं आवाहन करण्यात आले होते. यामुळे पर्यटकांसाठी माळशेज घाट दोन दिवसांसाठी बंद राहणार आहे. शनिवारी व रविवारी घाटात सहलीसाठी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांनी दिली आहे. 
 
सध्या परिसरात दरडींचा अंदाज घेणे सुरू आहे. दरम्यान वाहतुकीवर अद्याप बंदी घालण्यात आलेली नाही. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून माळशेज घाटात सतत दरडी कोसळण्याचा धोका जाणवत असल्यानं पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेण्यात येते 
 
माळशेज घाट हे मुसळधार पावसाचे आगार मानले जाते. माळशेज घाट आणि परिसरात दरवर्षी पावसाळ्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होतो. मागील वर्षी २०१६ मध्ये जुलै महिन्यात माळशेज घाटात ४ ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या, करंजाळे गावच्या हद्दीत एक डोंगरकडा कोसळला होता, तर ऑगस्ट महिन्यात करंजाळे गावाजवळ नगर- कल्याण महामार्गावर डांबरी रस्ता खचला होता.
 
दरडी आणि डोंगरकडे कोसळण्याच्या घटनेत सुदैवाने मोठा अपघात किंवा मोठी दुर्घटना झाली नव्हती, मात्र या काळात घाटातून वाहतूक करण्यास मोठा अडथळा निर्माण झाल्याने माळशेज मार्गे होणारी वाहतूक बंद करण्यात आली होती.
सन २०१६ पासून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने माळशेज घाटात घाटदुरुस्तीचे काम सुरू आहे. यापूर्वी घाटात अनेक ठिकाणी धोकादायक दरडींच्या ठिकाणी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी दरडी कोसळण्याची मोठी शक्यता आहे अशा ठिकाणी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत.