शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

अतिवृष्टीमुळे माळशेज घाटाकडे जाणारा रस्ता खचला, वाहतूक ठप्प

By admin | Updated: July 15, 2017 13:45 IST

माळशेज घाटाकडे जाणार रस्ता खचल्यानं दोन्ही दिशेकडील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे हा रस्ता खचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 15 - माळशेज घाटाकडे जाणार रस्ता खचल्यानं दोन्ही दिशेकडील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे हा रस्ता खचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  मुरबाडहून नगर/जुन्नर आेतूरहून माळशेजकडे जाणारा रस्ता खचला आहे. 
 
रस्ता खचल्यानं माळशेज परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. शिवाय, माळशेज घाटातील वाहतूक बंद असल्याने पुढील 2 ते 3 दिवस चाकण-तळेगाव मार्गावरील रहदारी वाढणार असल्यानं तळेगांव दाभाडे वाहतूक पोलिसांच्याही जबाबदारीत भर पडणार आहे.  
 
माळशेज घाटातील डोंगरकड्यांवरुन पाण्याचे प्रवाह गतीनं वाहणे सुरू झाले आहे. अशावेळी दरडी कोसळण्याची शक्यता असते. शुक्रवारी (14 जुलै ) रात्री राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांशी प्रांत अधिकारी प्रसाद उकार्डे यांनी चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने दोन दिवसांसाठी या घाटावरील दोन्ही बाजूनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार शुक्रवारी रात्रीपासून वाहतूक बंद करण्यात आली आहे. रविवारीदेखील पर्यटक तसेच सर्व वाहनांसाठी घाट बंद राहणार आहे.
 
आणखी बातम्या वाचा
(मुंबईकरांसाठी खूशखबर ! मोडक सागर धरण ओव्हरफ्लो)
(डेंग्यू, मलेरियाला "या" माशांमुळे बसणार आळा)
 
दरड कोसळण्याच्या भीतीमुळे माळशेज घाट 2 दिवस बंद
दरम्यान, ही घटना घडण्यापूर्वीच माळशेज घाटात कोणत्याही क्षणी दरड कोसळण्याची भीती वर्तवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिसांनी पर्यटकांना माळशेज घाटात न जाण्याचं आवाहन करण्यात आले होते. यामुळे पर्यटकांसाठी माळशेज घाट दोन दिवसांसाठी बंद राहणार आहे. शनिवारी व रविवारी घाटात सहलीसाठी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांनी दिली आहे. 
 
सध्या परिसरात दरडींचा अंदाज घेणे सुरू आहे. दरम्यान वाहतुकीवर अद्याप बंदी घालण्यात आलेली नाही. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून माळशेज घाटात सतत दरडी कोसळण्याचा धोका जाणवत असल्यानं पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेण्यात येते 
 
माळशेज घाट हे मुसळधार पावसाचे आगार मानले जाते. माळशेज घाट आणि परिसरात दरवर्षी पावसाळ्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होतो. मागील वर्षी २०१६ मध्ये जुलै महिन्यात माळशेज घाटात ४ ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या, करंजाळे गावच्या हद्दीत एक डोंगरकडा कोसळला होता, तर ऑगस्ट महिन्यात करंजाळे गावाजवळ नगर- कल्याण महामार्गावर डांबरी रस्ता खचला होता.
 
दरडी आणि डोंगरकडे कोसळण्याच्या घटनेत सुदैवाने मोठा अपघात किंवा मोठी दुर्घटना झाली नव्हती, मात्र या काळात घाटातून वाहतूक करण्यास मोठा अडथळा निर्माण झाल्याने माळशेज मार्गे होणारी वाहतूक बंद करण्यात आली होती.
सन २०१६ पासून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने माळशेज घाटात घाटदुरुस्तीचे काम सुरू आहे. यापूर्वी घाटात अनेक ठिकाणी धोकादायक दरडींच्या ठिकाणी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी दरडी कोसळण्याची मोठी शक्यता आहे अशा ठिकाणी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत.