शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

पुरामुळे बांधासह भातशेती गेली वाहून

By admin | Updated: August 4, 2016 02:34 IST

पावसाचा जोर कायम असून गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून याचा परिणाम सर्वच स्तरावर होतांना दिसत आहे़

विक्रमगड : पावसाचा जोर कायम असून गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून याचा परिणाम सर्वच स्तरावर होतांना दिसत आहे़ अतिवृष्टीमुळे भातशेती धोक्यात आली असून विक्रमगड तालुक्यासह खुडेद, बोरसेपाडा, कुंडाचापाडा, महालेपाडा आदी भागांतील शेतीचे बांध पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने शेतीसह वाहून गेले आहेत़ तर अनेकांची भातशेती पाण्याखाली व जास्त पावसामुळे लागवडीखाली भातरोपे कुजण्याचा संभव असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहेत़.अनेक भागात भातरोपे कुजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. खांड खरपडपाडा रस्त्यांची मोरी(पुल)तुटल्याने जवळजवळ ३०० लोकसंख्या असलेल्या या गावाला जाण्याचा मार्गच उरलेला नाही़ तसेच आंबेघर पुलाचे बांधकाम नवीन असतांनाही पुलाच्या सुरुवातीला व शेवटी असलेला रस्ता पाण्याबरोबर पाहून गेला आहे़ याबाबत खुडेद येथील ग्रामस्थांनी व खांड-खरपडपाडा ग्रामस्थांनी तत्काळ नुकसानभरपाई व दुरुस्तीकामी अर्ज सादर केला असल्याची प्रत पत्रकांना दिली आहे़यंदा जूनच्या पंधरवड्यापासूनच सर्वत्र पावसाची दमदार सुरुवात झाली आहे़ त्यानुसार शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता भातशेतीची कामे हाती घेतली. पावसाचे प्रमाण चांगले असल्याने भातरोपेही चांगल्या प्रकारे झाली. मात्र, सततच्या या पावसाने काही दिवस उघडीप न घेतल्याने भातांच्या खाचरात पाणी साठून या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने भातरोपे कुजण्याचे प्रकार सुरु झाले आहेत़ (वार्ताहर)>खांड-खरपडा रस्त्यामध्ये असलेली मोरी पावसाचे अतिवृष्टीने वाहून गेल्याने गावातील ३०० लोकांचा संपर्क तुटलेला आहे़ त्यांना रहदारीसाठी दुसरा मार्ग नाही यावर त्वरित उपाययोजना करण्याकामी मी अर्ज सादर केलला आहे़- विजय खुताडे, माजी सरपंच, आेंंद.>मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतामध्ये नदीसारखे पाणी वाहत होते. त्यामध्ये आमचे गावपाड्यातील शेतीची बांधबंधिस्ती वाहून गेल्याने आमचे मोठे नुकसान झालेले आहे़- विष्णू नवसू चौधरी, खुडेद.