शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

शेततळ्यांमुळे दुष्काळातही हरितक्रांती, डाळिंब उत्पादनातून ५० कोटींची उलाढाल

By admin | Updated: July 5, 2016 11:59 IST

पाण्याचे कोणतेही स्रोत नसताना केवळ पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून तेच पाणी शेततळ्याच्या माध्यमातून डाळिंबाला वापरून अजनाळे गावाने दुष्काळातही हरितक्रांती केली.

अरुण लिगाडे

सांगोला (सोलापूर), दि. ५ - : पाण्याचे कोणतेही स्रोत नसताना केवळ पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून तेच पाणी शेततळ्याच्या माध्यमातून डाळिंबाला वापरून अजनाळे (ता. सांगोला) गावाने दुष्काळातही हरितक्रांती केली आहे. डाळिंबाचा कॅलिफोर्निया म्हणून या गावाची ओळख आहे. डाळिंबाच्या उत्पन्नातून सरासरी वार्षिक ५० कोटींची उलाढाल होत असल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. ३२५ शेततळ्यांच्या सुमारे ५०० कोटी पाणीसाठ्यामुळे अजनाळे गाव चांगली वॉटरबँक झाले असून पर्यटनाच्या दृष्टीने हे गाव आदर्श मॉडेल म्हणून पुढे येत आहे. सांगोल्यापासून सोळा कि.मी. अंतरावरील ४५०० लोकसंख्येचे अजनाळे गाव आहे. गावाचे भौगोलिक क्षेत्र २ हजार २२७ हेक्टर उंचवट्यावर विखुरलेले आहे. गावातील २०७० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून २९१ हेक्टर निव्वळ पडीक क्षेत्र आहे. गावात १६१२ खातेदार असून २२२७ हेक्टरपैकी ११०० हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाच्या बागा लागवडीखाली आहेत. तर इतर क्षेत्रावर रब्बीमध्ये ज्वारी, गहू, हरभरा, मका, चारा आदी पिके तर खरीप हंगामामध्ये बाजरी, मका, चारा आदी पिके घेतली जातात. या गावाला पावसाळ्यातील पाण्याव्यतिरिक्त कॅनॉल, योजना अगर प्रकल्पांतून कोणत्याही पाण्याचा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पावसाळ्यात पडलेले पाणी अडवून दुष्काळातही पाणीटंचाईवर मात केली आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचे महत्त्व ओळखून सन १९८४ पासून शंभर टक्के ठिबक सिंचनाद्वारे शेती व्यवसायावर भर दिला आहे. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या योजनेतून गावातील ओढ्यावर दहा सिमेंट बंधारे, रोजगार हमी योजनेतून सत्तावीस पाझर तलाव, नव्वद नाले घेऊन पाणी टंचाईवर मात केली आहे. साधारण १ कोटी लिटर शेततळ्याच्या पाण्यावर २५ एकर डाळिंबाची बाग ठिबक सिंचन अंतर्गत ओलिताखाली येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेततळ्यावर अधिक भर दिला आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यात फळ काढणीचा बहार असल्याने पाण्याची आवश्यकता असल्यामुळे शेततळ्यातील पाणी उपयुक्त ठरते. म्हणूनच गावात राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत (एन.एच.एम.) सन २०१२-१३, १३-१४ मध्ये ६४ सामूहिक शेततळ्यांना मंजुरी घेतली होती. पैकी २ कोटी १९ लाख खर्चून ४२ शेततळी पूर्ण केली आहेत. याव्यतिरिक्त येथील शेतकऱ्यांनी स्वखर्चातून १ कोटी, १.५ कोटी, २.५ कोटी लिटर पाणी क्षमतेची जवळपास २७६ शेततळी निर्माण करुन पाणी टंचाईला पर्याय शोधला आहे. अजनाळे गावात शेततळ्याच्या पाण्यावर डाळिंबाच्या हरितक्रांतीमुळे येथील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. जास्तीत जास्त वृक्षलागवडीचा संकल्प जलयुक्त शिवार अभियानांतर्गत लोकसहभागातून पाझर तलाव, ओढे, नाल्यातून गाळ काढणे त्याचबरोबर विहीर, बोअर पुनर्भरणाची कामे मोठ्या प्रमाणात राबविली जात आहेत. पर्जन्यमान वाढविण्याच्या दृष्टीने प्रत्येक शेतकऱ्याने शेत परिसरात जास्तीत जास्त वृक्षलागवड करण्याचा संकल्प केल्याचे ग्रा.पं. सदस्य देवदत्त धांडोरे यांनी सांगितले.

शासनाने शेततळ्यास दिलेले अनुदान पुरेसे नसल्यामुळे या पैशावर शेततळी पूर्ण होणार नाहीत. काँग्रेस आघाडीच्या सरकारने शेततळ्याला पुरेसे अनुदान दिल्याने गावात मोठ्या प्रमाणात शेततळी निर्माण झाली. भाजप आघाडी सरकारने शेततळ्याला पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा. - विजय येलपले सरपंच, अजनाळे