शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ निधी टंचाईसाठी खुला

By admin | Updated: June 28, 2014 01:04 IST

अपुरा साठा यातून निर्माण झालेली स्थिती लक्षात घेऊन टंचाई निवारणासाठी अपवाद म्हणून दुष्काळ निधी खुला करण्याचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत.

मुंबई : जीवघेणी प्रतीक्षा करायला लावणारा पावसाळा व राज्यभरातील पाण्याचा अपुरा साठा यातून निर्माण झालेली स्थिती लक्षात घेऊन टंचाई निवारणासाठी अपवाद म्हणून दुष्काळ निधी खुला करण्याचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. टंचाई निवारणाच्या उपाययोजनांचे प्रस्ताव जिल्हाधिका:यांकडून आल्यास त्यासाठी मुख्यमंत्री दुष्काळ  सहायता निधीमधून आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी सांगितले. 
मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानातून तीन विभागीय आयुक्त (नाशिक, पुणो, औरंगाबाद) तसेच या तीन विभागातील 2क् जिल्हाधिका:यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. राज्यात पाऊस लांबल्यामुळे या विभागात काय परिस्थिती आहे, त्याचा आढावा घेण्यासाठी, उपाययोजना करण्यासाठी काय पावले उचलावी लागतील याबाबत मुख्यमंत्र्यांनी हा संवाद साधला. 
राज्यातील पाणीस्थिती बघता मुख्यमंत्री साहाय्यता निधीतील दोन कोटींर्पयतचा निधी खर्च करण्याची 3क् जूनला संपणारी मुदत वाढवून देण्याचे निर्देशही चव्हाण यांनी दिले. राज्यातील उपलब्ध पाण्याचा वापर प्राधान्याने पिण्यासाठी करण्याच्या सूचनाही त्यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिका:यांना दिल्या. या वेळी मुख्य सचिव जे.एस. सहारीया, कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, वित्त विभाग अप्पर मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव, लाभक्षेत्रविकास विभाग प्रधान सचिव मालिनी शंकर, पाणीपुरवठा विभागाचे प्रधानसचिव राजेशकुमार, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव मिलिंद म्हैसकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पाणीपुरवठा योजना, सिमेंट नाला बंधारे बांधण्यासाठी आवश्यक तो निधी प्रत्येक जिल्ह्याला देण्यात येईल. यासाठी तातडीने तसे प्रस्ताव तयार करून मुख्य सचिवांकडे सादर करावेत. राज्यातील शिल्लक पाणीसाठय़ाचा वापरात पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे. तसेच धरणातील पाणी जिल्हाधिका:यांच्या परवानगीशिवाय सोडू नये, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. (प्रतिनिधी)
 
अनेक जिल्ह्यांत दुबार पेरणी
च्मुख्यमंत्री म्हणाले की, पाऊस न पडल्याने अनेक जिल्ह्यांत दुबार पेरणी करावी लागेल, तसेच अनेक गावांना टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणो आवश्यक आहे. पाऊस न पडल्यास चा:याचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो, त्यामुळे या परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हाधिका:यांनी आपापल्या जिल्ह्याचा आपत्कालीन आराखडा तयार करावा. अजून काही दिवस पाऊस न पडल्यास पिण्याच्या पाण्यासाठी अधिक टँकर्स मागवावे लागतील, यासाठीचे नियोजन करावे लागेल, असे त्यांनी सांगितले. 
च्लागोपाठ दोन वर्ष महाराष्ट्राला दुष्काळाला सामोरे जावे लागले आहे.  त्यामुळे दुष्काळ निवारण्याचा आराखडा तातडीने तयार करावा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच औरंगाबाद विभागाची स्वतंत्र बैठक त्वरित घेण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. ज्या जिल्ह्यांमध्ये मागील दोन वर्षात गाळ काढण्याचे, सिमेंट साखळी बंधा:याचे काम पूर्ण झाले आहे, त्याचे डॉक्युमेंटेशन करावे, अशा सूचनाही चव्हाण यांनी दिल्या.