शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

ड्रॅगनचा फुत्कार म्हणे, आता चीनही १९६२चा राहिलेला नाही

By admin | Updated: July 4, 2017 06:14 IST

२०१७ मधील भारत १९६२ मधील भारतापेक्षा वेगळा आहे, या संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्या इशाऱ्याला सोमवारी चीनने प्रत्युत्तर दिले. चीनही

बीजिंग : २०१७ मधील भारत १९६२ मधील भारतापेक्षा वेगळा आहे, या संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्या इशाऱ्याला सोमवारी चीनने प्रत्युत्तर दिले. चीनही  आता १९६२ सालचा राहिलेला नाही, याची भारताने जाणीव ठेवावी. चीन  आपल्या सीमांचे व सार्वभौमत्वाचे सर्व शक्तिनिशी रक्षण करेल, असे चीनने  स्पष्ट केले आहे. ५५ वर्षांपूर्वीच्या युद्धाचे संदर्भ देत, भारताने त्यापासून धडा घेण्याची गरज आहे, असे मत चीनने व्यक्त केले होते. त्यावर जेटली यांनी उत्तर दिले होते. सिक्कीम भागात भारत आणि चीन यांच्या सैनिकात जे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यास चीन जबाबदार असल्याचेही जेटली यांनी म्हटले होते. जेटली यांच्या विधानावर उत्तर देताना, चीनचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते जेंग शुआंग म्हणाले की, भारताने १८९०च्या कराराचे पालन करावे आणि चीनच्या क्षेत्रात घुसलेल्या सैनिकांना परत बोलवावे. चीन आपल्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आवश्यक सर्व पावले उचलेल. चीन आणि भारतात डोकाला भागात एक महिन्यापासून तणाव निर्माण झाला आहे. (वृत्तसंस्था)सीमेचा आदर करावापं. जवाहरलाल नेहरू यांनी चीनचे तत्कालीन पंतप्रधान चाऊ एन लाय यांना लिहिलेल्या पत्रात चीन व ब्रिटनमध्ये झालेला सीमा करार मान्य केला होता व त्यानंतरच्या भारताच्या पंतप्रधानांनीही याला दुजोरा दिला होता. त्यामुळे भारताने करारानुसार ठरलेल्या सीमेचा आदर करावा, असेही चीनने म्हटले आहे.