शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरी वातावरणाने मुंबईकर झाले त्रस्त

By admin | Updated: November 4, 2014 03:09 IST

दमट वाऱ्यासोबत वाहणाऱ्या मुंबईत सध्या कमाल आणि किमान तापमानात तब्बल १५ अंशाचा फरक नोंदविण्यात येत असून, या फरकामुळे मुंबईकर कमालीचे त्रस्त झाले

मुंबई : दमट वाऱ्यासोबत वाहणाऱ्या मुंबईत सध्या कमाल आणि किमान तापमानात तब्बल १५ अंशाचा फरक नोंदविण्यात येत असून, या फरकामुळे मुंबईकर कमालीचे त्रस्त झाले आहेत. विशेषत: दिवसा तप्त ऊन आणि रात्री वाहणारे थंड वारे; अशा दुहेरी वातावरणाला मुंबईकरांना सामोरे जावे लागत आहे.२९ आॅक्टोबर रोजी मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात १३ अंशाचा फरक नोंदविण्यात आला होता. ३ नोव्हेंबर रोजी त्यात २ अंशानी वाढ झाली असून, सोमवारचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३७, २१.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. मध्यंतरी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निलोफर या चक्रीवादळामुळे शहराचे कमाल आणि किमान तापमान खाली उतरले होते. कमाल तापमान २८ आणि किमान तापमान २४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत होते. आता निलोफर शमून बरेच दिवस उलटल्याने कमाल तापमानात कमालीची वाढ झाली असून, गेल्या पाच दिवसांपासून शहराचे कमाल तापमान सलग ३५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकण आणि गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, पुढील २४ तासांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. पुणे व मुंबईत आकाश मुख्यत: निरभ्र राहील; आणि मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २० अंशाच्या आसपास राहील. (प्रतिनिधी)