शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
4
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
5
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
6
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
7
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
8
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
9
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
10
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
11
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
12
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
13
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
14
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
15
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
16
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
17
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
20
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?

दुहेरी वातावरणाने मुंबईकर झाले त्रस्त

By admin | Updated: November 4, 2014 03:09 IST

दमट वाऱ्यासोबत वाहणाऱ्या मुंबईत सध्या कमाल आणि किमान तापमानात तब्बल १५ अंशाचा फरक नोंदविण्यात येत असून, या फरकामुळे मुंबईकर कमालीचे त्रस्त झाले

मुंबई : दमट वाऱ्यासोबत वाहणाऱ्या मुंबईत सध्या कमाल आणि किमान तापमानात तब्बल १५ अंशाचा फरक नोंदविण्यात येत असून, या फरकामुळे मुंबईकर कमालीचे त्रस्त झाले आहेत. विशेषत: दिवसा तप्त ऊन आणि रात्री वाहणारे थंड वारे; अशा दुहेरी वातावरणाला मुंबईकरांना सामोरे जावे लागत आहे.२९ आॅक्टोबर रोजी मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात १३ अंशाचा फरक नोंदविण्यात आला होता. ३ नोव्हेंबर रोजी त्यात २ अंशानी वाढ झाली असून, सोमवारचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३७, २१.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. मध्यंतरी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निलोफर या चक्रीवादळामुळे शहराचे कमाल आणि किमान तापमान खाली उतरले होते. कमाल तापमान २८ आणि किमान तापमान २४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत होते. आता निलोफर शमून बरेच दिवस उलटल्याने कमाल तापमानात कमालीची वाढ झाली असून, गेल्या पाच दिवसांपासून शहराचे कमाल तापमान सलग ३५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकण आणि गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, पुढील २४ तासांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. पुणे व मुंबईत आकाश मुख्यत: निरभ्र राहील; आणि मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २० अंशाच्या आसपास राहील. (प्रतिनिधी)