शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

वळवाच्या पावसाने झोडपले

By admin | Updated: May 14, 2017 05:39 IST

शनिवारी राज्यात ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूरसह धुळे व नगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वळवाचा पाऊस झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शनिवारी राज्यात ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूरसह धुळे व नगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वळवाचा पाऊस झाला. राज्यात इतर ठिकाणी ढगाळ वातावरण होते. मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती असून १५ मेपर्यंत दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात पावसाचे आगमन होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ दुर्घटनेत दोघांचा बळी गेला. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी झालेल्या पावसाने ठाणे जिल्ह्याच्या बहुतांश भागांत वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे वाहतुकीलाही फटका बसला. रत्नागिरीतील खेड, मंडणगड, दापोली तालुक्याला शुक्रवारी रात्रीपासून पावसाने झोडपले. खेड तालुक्यात विजेच्या आवाजाच्या धक्क्याने आदित्य अशोक मोरे (१४) याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.पुण्यात रात्री अर्धा तास तर जिल्ह्यात शिरूर, खेड, आंबेगाव तालुक्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात माण, खटाव, महाबळेश्वर, खंडाळा, वाईत पाऊस झाला. अंबेनळी घाटात रस्त्यावर दगड व झाडे पडली आहेत. धुळे परिसरात पावसामुळे वृक्ष उन्मळून पडले. शनिवारी दुपारपर्यंत वीजपुरवठा खंडीत होता. चंद्रपूरमध्ये बल्लारपूर, मूल, सिंदेवाही तालुक्यात पाऊस बरसला. लालपेठ परिसरात काजल गुप्ता (९) हिचा झाड कोसळून मृत्यू झाला. शिर्डीतही पावसाने जोरदार हजेरी लावली.