शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

बालगृहे ओस पडण्याच्या मार्गावर, प्रवेश प्रक्रियेत आयुक्तांचा खोडा

By admin | Updated: July 4, 2016 02:15 IST

निराश्रित बालकांचे थकीत अनुदान देण्याचे झिडकारून अशा बालकांना बालगृहात प्रवेशच देऊ नका

स्नेहा मोरे,

मुंबई- निराश्रित बालकांचे थकीत अनुदान देण्याचे झिडकारून अशा बालकांना बालगृहात प्रवेशच देऊ नका, या महिला व बालविकास विभागाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. राज्यातील ७०० स्वयंसेवी बालगृहांतील सुमारे ७० हजार विद्यार्थी शाळाबाह्य राहून वाम मार्गाला लागण्याची भीती निर्माण झाली आहे.बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५च्या कलम २ (१४)मध्ये काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना बालगृहात प्रवेश देण्याचे नमूद केलेले आहे. मात्र महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तांनी पोटकलम १ ते १२च्या पलीकडे जाऊन अधिनियमाचा चुकीचा व सोयीचा अर्थ लावत बालगृहात फक्त ‘अनाथ’ मुलांनाच प्रवेश देण्याचे आदेश द्यावेत, असे सज्जड दमवजा निर्देश जिल्हास्तरीय बाल कल्याण समित्यांना दिले. समित्यांनी आयुक्तांचे तोंडी आदेश मानून बालगृहात सध्या वास्तव्यास असलेल्या एक पालक, गरजू, गरीब आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांचे प्रवेश एकाच दिवशी रद्द करून हजारो मुलांना रस्त्यावर आणून सोडले आहे. मुलांना सांभाळण्याची व त्यांना शिक्षण देण्याची परिस्थिती नसलेले पालक आपल्या पाल्याला बालगृहांत आणून सोडतात. अशा स्थितीत त्यांच्या पश्चात बालकल्याण समित्यांनी बालगृहांतून हुसकावून लावलेली मुले गावी गेल्यावर पालक नसताना गावात जगतील तरी कशी? ही मुले शाळाबाह्य राहून वाईट संगतीत बालगुन्हेगारीकडे वळून शोषणाचे बळी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. अशा हजारो बालकांमुळे सामाजिक प्रश्न निर्माण होणार असल्याने आयुक्तांनी निर्माण केलेली कोंडी फोडण्यासाठी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सचिव, आयुक्त आणि बालगृह चालकांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक मंत्रालयात बोलावली होती, मात्र त्यात काहीच निष्पन्न झाले नाही. >हा प्रश्न सामाजिक स्वास्थ्याचामहिला व बालविकास आयुक्तांच्या अशा भूमिकेमुळे ऐन शाळा सुरू होण्याच्या काळात बालकांचे प्रवेश संस्थेतून रद्द करण्याची बाल कल्याण समित्यांची कृती म्हणजे आयुक्तांना खूश करून मुलांचे शैक्षणिक नुकसान करणारी तर आहेच; शिवाय एकाच वेळी हजारो बालके संस्थाबाह्य राहिल्यावर सामाजिक स्वास्थ्याचा नवा प्रश्न निर्माण होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य बालगृह चालक व कर्मचारी महासंघाने म्हटले आहे.