शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अवयव दान अधुरे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2016 21:25 IST

अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका रुग्णाचे अवयव दान करण्याचा निर्णय नातेवाईकांनी लातुरातील सह्याद्री रुग्णालयाच्या डॉक्टरांकडे कळविला.

ऑनलाइन लोकमत

लातूर, दि.10 -  अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका रुग्णाचे अवयव दान करण्याचा निर्णय नातेवाईकांनी लातुरातील सह्याद्री रुग्णालयाच्या डॉक्टरांकडे कळविला. मात्र डॉक्टरांनी तसेच शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रतिसाद न दिल्यामुळे अवयव दान होऊ शकले नाही. परिणामी, काही वेळातच बुधवारी सायंकाळी त्या रुग्णाचा मृत्यू झाला. केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या मुलाचे अवयव दान होऊ शकले नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. कळंब तालुक्यातील मोहा येथील भरत कोंडिबा नागटिळक यांचा रविवारी बार्शी ते कळंब रस्त्यावर अपघात झाला. अपघातानंतर उपचारासाठी त्याला लातूर येथील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे भरत कोंडिबा नागटिळक (वय ३०) यांच्या नातेवाईकांनी उपचार करणारे डॉ. हनुमंत किनीकर यांच्याकडे अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त करून निर्णय कळविला. मात्र डॉ. किनीकर यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा शल्य चिकित्सक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातांनाही अवयव दान करण्यासंदर्भात कळविले. मात्र या यंत्रणेचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे भरत नागटिळक यांचे चुलत भाऊ नारायण नागटिळक यांनी थेट निवासी उपजिल्हाधिकारी नारायणराव उबाळे यांच्याशी संपर्क साधून अवयव दान करण्याला डॉक्टरांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे कळविले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी उबाळे यांनी रुग्णालयाशी संपर्क साधला. मात्र तोपर्यंत भरतचा सायंकाळी मृत्यू झाला अन् नातेवाईकांनी व्यक्त केलेली अवयव दानची इच्छा अधुरी राहिली, असा आरोप नारायण नागटिळक यांनी केला आहे. प्रोसीजर केली; नातेवाईकांचा आरोप असमजातून...नातेवाईकांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर आम्ही तात्काळ शासकीय रुग्णालयाला कळविले. परंतु, अवयव दान करण्यासाठी बीपी १०० च्या पुढे असणे आवश्यक आहे, आॅक्सिजन, पल्सही नियमानुसार असणे आवश्यक आहे. ते अवयव दान करण्याच्या नियमात बसत नव्हते. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना या रुग्णाचे अवयव घेता आले नाहीत. नातेवाईकांचा आरोप असमजातून आहे. डोळे तेवढे दान करता येतील, असे नातेवाईकांना कळविले असल्याचे डॉ. हनुमंत किनीकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.