शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

उत्पादन घटल्याने टोमॅटो कडाडला, भाव गेला ८० पार!

By admin | Updated: June 3, 2016 03:44 IST

दुष्काळामुळे केलेली लागवड शेतकऱ्यांना नाइलाजाने काढून टाकावी लागल्याने उत्पादन घटून टोमॅटोचे भाव कडाडले आहेत. गेल्या महिन्यात पंधरा ते वीस रुपये किलोने मिळणारा टोमॅटो या आठवड्यात

नवी मुंबई /सातारा : दुष्काळामुळे केलेली लागवड शेतकऱ्यांना नाइलाजाने काढून टाकावी लागल्याने उत्पादन घटून टोमॅटोचे भाव कडाडले आहेत. गेल्या महिन्यात पंधरा ते वीस रुपये किलोने मिळणारा टोमॅटो या आठवड्यात तब्बल ८० रुपयांच्या पुढे गेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बागायती टप्प्यात टोमॅटोचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हाच टोमॅटो मुंबई आणि पुण्याच्या घाऊक बाजारात जातो, परंतु गेल्या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील धरणांचा पाणीसाठा तळाला गेला आहे. यामुळे धरणांच्या पायथ्याशी असणाऱ्या बागायत शेतीसाठी पाणी पूर्णत: बंद केले गेल्याने, फळभाज्यांची लागवडच शेतकऱ्यांना थांबवावी लागली. याचा सर्वाधिक विपरित परिणाम टोमॅटोच्या उत्पादनावर झाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक कमी झाल्यामुळे टोमॅटोचे भाव वाढू लागले आहेत. मार्केटमध्ये ३० ते ३५ ट्रक टेम्पोमधून सुमारे १४०० क्विंटलची आवक होत आहे. दोन महिन्यांपूर्वी हीच आवक तिप्पट होती. आवक कमी असल्याने घाऊक बाजारातील दर ४० ते ४५ रुपये किलो झाला असून, किरकोळ बाजारातमध्ये टोमॅटो ८० रुपये प्रतिकिलो विकला जात आहे.पाण्याअभावी बागायतदारांना कोणतेच पीक घेता येईनासे झाले आहे. टोमॅटोला दर आठवड्याला एक वेळा पाणी द्यावे लागते. धरणांमध्ये तर पाणी नाही, तसेच वारंवार वीजकपातही होत असते. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी टोमॅटोकडे पाठ फिरवली, तर अनेक शेतकऱ्यांना केलेली लागवड काढून टाकावी लागली, अशी व्यथा धनकडेवाडीचे (ता. वाई) शेतकरी सुरेश पवार यांनी मांडली.(लोकमत न्यूज नेटवर्क)प्रमुख बाजारपेठांतील टोमॅटोचे होलसेल भाव शहरबाजारभाव आवकमुंबई४० ते ४५१४००सातारा४० ते ४५६९पुणे१५ ते ४२८९०कोल्हापूर१० ते ५०९१६संगमनेर१० ते ४५१२५००जुन्नर ६.५० ते ८.५०१६२६०