शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: June 28, 2016 02:43 IST

शुक्रवारी दुपारी आगमन झालेल्या पावसाने सोमवारीही आपली संततधार कायम ठेवली.

ठाणे : शुक्रवारी दुपारी आगमन झालेल्या पावसाने सोमवारीही आपली संततधार कायम ठेवली. ठाणे शहरात सोमवारी दिवसभरात ८० मिमीच्या आसपास पावसाची नोंद झाली. यामुळे ठाणे शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले. ब्रह्मांड येथे पावसामुळे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून ८ गाड्यांचे नुकसान झाले. तर, पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये गेल्या २४ तासांत विक्र मी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, मुरबाड, शहापूर आदी तालुक्यांनाही पावसाने चांगलेच झोडपून काढले. विशेष म्हणजे धरण क्षेत्रातही पाऊस बरसण्यास सुरुवात झाल्याने आता समाधान व्यक्त होत आहे. या पावसामुळे मुंबईतील तिन्ही मार्गांवरील लोकलसेवा विस्कळीत झाली होती. मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गांवरील लोकल उशिराने धावत होत्या. लांबलेल्या पावसाने शुक्रवारी जिल्ह्यात आगमन केले. त्यानंतर, सलग तीन दिवस पावसाने आपली हजेरी कायम ठेवली आहे. या पावसामुळे शहराच्या अनेक भागांत पडझडीच्या घटना घडल्या. ठाण्याच्या आपत्कालीन कक्षाकडे सोमवारी सुमारे २८ तक्र ारींची नोंद झाली. त्यामध्ये शॉर्टसर्किट १, झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या ९, पाणी तुंबण्याची १, भिंत कोसळण्याची एक अशा तक्र ारींचा समावेश होता. ब्रह्मांड येथे एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्यामुळे भिंतीलगतच्या २ कार आणि ६ दुचाकींचे नुकसान झाले. तर, कोपरी येथील रतन सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावरील गांगुर्डे यांच्या घराचे छत कोसळले. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. मुरबाड, शहापूर, कल्याण तालुक्यांमध्येही पावसाने चांगलीच हजेरी लावली. धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या मुरबाड-शहापुरातही पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भातसा धरण क्षेत्रामध्ये दिवसभरात ४०, मोडकसागर धरण क्षेत्रात ३१.४०, तानसा धरण क्षेत्रात ३१.४० आणि बारवी धरण क्षेत्रात गेल्या २४ तासांत २४ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये गेल्या २४ तासांत विक्र मी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत डहाणूमध्ये २५१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १० वर्षांत डहाणू शहरात झालेला हा सर्वाधिक पाऊस असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. पालघर जिल्ह्यात जूनच्या सुरु वातीला दडी मारून बसलेल्या वरु णराजाने महिन्याच्या अखेरीला जोरदार हजेरी लावली. यामुळे नद्यानाल्यांची पाणीपातळी वाढली असून बळीराजा सुखावला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी योग्य नियोजनाअभावी जनजीवन विस्कळीत झाले आहे. वरुणराजाने रंग दाखवताच प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी पूर्ण केलेले रस्ते, वीज आणि नालेसफाईचे दावे फोल ठरले आहेत. पहिल्याच पावसात काही ठिकाणचे रस्ते वाहून गेले आहेत. काही ठिकाणी विजेचा सततचा लपंडाव सुरू असून चहूकडे पाणीचपाणी झाले आहे.>उल्हासनगरात ३ दिवसांत १८ झाडे पडलीउल्हासनगर शहरातील जनजीवन संततधार पावसाने विस्कळीत झाले आहे. तीन दिवसांत १८ पेक्षा जास्त झाडे कोसळली असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यावर झाड पडल्याने पोलीस ठाण्याचे पत्रे फुटून विद्युतपुरवठा खंडित झाला होता. तर, सखल भागांत पाणी साचण्याचे प्रकार घडले.उल्हासनगरातील मार्केट परिसरात स्मशानशांतता पसरली आहे. गुलशननगर, साईनाथ कॉलनी, राधास्वामी सत्संग, कल्याण-अंबरनाथ रस्ता, आयटीआयसमोर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.गेल्या २४ तासांपेक्षा जास्त काळ पोलीस ठाण्याचा वीजपुरवठा खंडित झाला असून सार्वजनिक विभागाने दुरुस्ती काम सुरू केले आहे. उभ्या असलेल्या ४ ते ५ मोटारसायकलींवर झाड पडल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. शहरातील नाले तुंबून शहरात पाणी साचल्याच्या घटना घडल्या नसल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रमुख विनोद केणी यांनी दिली.अंबरनाथ-बदलापूरला दमदार हजेरीअंबरनाथ : अंबरनाथ-बदलापूर परिसरांत पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे ठिकठिकाणी सखल भागांत पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीसह जनजीवन विस्कळीत झाले. यात शालेय विद्यार्थ्यांचे जास्त हाल झाले.वाहतूककोंडीने कल्याण-डोंबिवलीकर हैराण : कल्याण - संततधार पावसाने सोमवारी चौथ्या दिवशी कल्याण-डोंबिवलीला झोडपले. यामुळे शहरातील सखल भागांत पाणी साचले असून अनेक ठिकाणी नाले तुंबले आहेत. विजेच्या लपंडावाने शहरवासी हैराण झाले आहेत. शहरातील शीळफाटा रोड, मानपाडा रोड, अंबरनाथ रोडवर वाहतूककोंडी झाल्याने वाहनचालकांचे हाल झाले. कल्याण बस आगारात पावसाचे पाणी साचले असून त्याचा निचरा होण्यास जागा नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. याशिवाय रामबाग, मानपाडा रोडसह अनेक गावठाणांत कचरा वेळेत उचलला न गेल्याने संताप व्यक्त होत आहे.