शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: June 28, 2016 02:43 IST

शुक्रवारी दुपारी आगमन झालेल्या पावसाने सोमवारीही आपली संततधार कायम ठेवली.

ठाणे : शुक्रवारी दुपारी आगमन झालेल्या पावसाने सोमवारीही आपली संततधार कायम ठेवली. ठाणे शहरात सोमवारी दिवसभरात ८० मिमीच्या आसपास पावसाची नोंद झाली. यामुळे ठाणे शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले. ब्रह्मांड येथे पावसामुळे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून ८ गाड्यांचे नुकसान झाले. तर, पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये गेल्या २४ तासांत विक्र मी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, मुरबाड, शहापूर आदी तालुक्यांनाही पावसाने चांगलेच झोडपून काढले. विशेष म्हणजे धरण क्षेत्रातही पाऊस बरसण्यास सुरुवात झाल्याने आता समाधान व्यक्त होत आहे. या पावसामुळे मुंबईतील तिन्ही मार्गांवरील लोकलसेवा विस्कळीत झाली होती. मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गांवरील लोकल उशिराने धावत होत्या. लांबलेल्या पावसाने शुक्रवारी जिल्ह्यात आगमन केले. त्यानंतर, सलग तीन दिवस पावसाने आपली हजेरी कायम ठेवली आहे. या पावसामुळे शहराच्या अनेक भागांत पडझडीच्या घटना घडल्या. ठाण्याच्या आपत्कालीन कक्षाकडे सोमवारी सुमारे २८ तक्र ारींची नोंद झाली. त्यामध्ये शॉर्टसर्किट १, झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या ९, पाणी तुंबण्याची १, भिंत कोसळण्याची एक अशा तक्र ारींचा समावेश होता. ब्रह्मांड येथे एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्यामुळे भिंतीलगतच्या २ कार आणि ६ दुचाकींचे नुकसान झाले. तर, कोपरी येथील रतन सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावरील गांगुर्डे यांच्या घराचे छत कोसळले. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. मुरबाड, शहापूर, कल्याण तालुक्यांमध्येही पावसाने चांगलीच हजेरी लावली. धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या मुरबाड-शहापुरातही पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भातसा धरण क्षेत्रामध्ये दिवसभरात ४०, मोडकसागर धरण क्षेत्रात ३१.४०, तानसा धरण क्षेत्रात ३१.४० आणि बारवी धरण क्षेत्रात गेल्या २४ तासांत २४ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये गेल्या २४ तासांत विक्र मी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत डहाणूमध्ये २५१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १० वर्षांत डहाणू शहरात झालेला हा सर्वाधिक पाऊस असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. पालघर जिल्ह्यात जूनच्या सुरु वातीला दडी मारून बसलेल्या वरु णराजाने महिन्याच्या अखेरीला जोरदार हजेरी लावली. यामुळे नद्यानाल्यांची पाणीपातळी वाढली असून बळीराजा सुखावला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी योग्य नियोजनाअभावी जनजीवन विस्कळीत झाले आहे. वरुणराजाने रंग दाखवताच प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी पूर्ण केलेले रस्ते, वीज आणि नालेसफाईचे दावे फोल ठरले आहेत. पहिल्याच पावसात काही ठिकाणचे रस्ते वाहून गेले आहेत. काही ठिकाणी विजेचा सततचा लपंडाव सुरू असून चहूकडे पाणीचपाणी झाले आहे.>उल्हासनगरात ३ दिवसांत १८ झाडे पडलीउल्हासनगर शहरातील जनजीवन संततधार पावसाने विस्कळीत झाले आहे. तीन दिवसांत १८ पेक्षा जास्त झाडे कोसळली असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यावर झाड पडल्याने पोलीस ठाण्याचे पत्रे फुटून विद्युतपुरवठा खंडित झाला होता. तर, सखल भागांत पाणी साचण्याचे प्रकार घडले.उल्हासनगरातील मार्केट परिसरात स्मशानशांतता पसरली आहे. गुलशननगर, साईनाथ कॉलनी, राधास्वामी सत्संग, कल्याण-अंबरनाथ रस्ता, आयटीआयसमोर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.गेल्या २४ तासांपेक्षा जास्त काळ पोलीस ठाण्याचा वीजपुरवठा खंडित झाला असून सार्वजनिक विभागाने दुरुस्ती काम सुरू केले आहे. उभ्या असलेल्या ४ ते ५ मोटारसायकलींवर झाड पडल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. शहरातील नाले तुंबून शहरात पाणी साचल्याच्या घटना घडल्या नसल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रमुख विनोद केणी यांनी दिली.अंबरनाथ-बदलापूरला दमदार हजेरीअंबरनाथ : अंबरनाथ-बदलापूर परिसरांत पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे ठिकठिकाणी सखल भागांत पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीसह जनजीवन विस्कळीत झाले. यात शालेय विद्यार्थ्यांचे जास्त हाल झाले.वाहतूककोंडीने कल्याण-डोंबिवलीकर हैराण : कल्याण - संततधार पावसाने सोमवारी चौथ्या दिवशी कल्याण-डोंबिवलीला झोडपले. यामुळे शहरातील सखल भागांत पाणी साचले असून अनेक ठिकाणी नाले तुंबले आहेत. विजेच्या लपंडावाने शहरवासी हैराण झाले आहेत. शहरातील शीळफाटा रोड, मानपाडा रोड, अंबरनाथ रोडवर वाहतूककोंडी झाल्याने वाहनचालकांचे हाल झाले. कल्याण बस आगारात पावसाचे पाणी साचले असून त्याचा निचरा होण्यास जागा नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. याशिवाय रामबाग, मानपाडा रोडसह अनेक गावठाणांत कचरा वेळेत उचलला न गेल्याने संताप व्यक्त होत आहे.