शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

थंडीमुळे वाढतात आजार ,घ्या विशेष काळजी

By admin | Updated: November 7, 2016 03:19 IST

आॅक्टोबर हिटच्या झळानंतर मुंबईकरांना नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच थंडी अनुभवायला मिळत आहे. मुंबईतील तापमानाचा पारा घटला असल्यामुळे, मुंबईकरांनी विशेष काळजी घ्यायला हवी

मुंबई : आॅक्टोबर हिटच्या झळानंतर मुंबईकरांना नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच थंडी अनुभवायला मिळत आहे. मुंबईतील तापमानाचा पारा घटला असल्यामुळे, मुंबईकरांनी विशेष काळजी घ्यायला हवी. थंडी वाढल्यामुळे श्वसनासंबधीचे आजार आणि सांधेदुखीचे प्रमाण वाढते. वातावरणातील बदलांचा परिणाम हा आरोग्यावर होतो. या काळात सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढते. हवेतील बदलांमुळे आजार वाढल्यास तत्काळ उपचार घेणे आवश्यक आहे. सर्दी-खोकल्याबरोबरच सायनसचा त्रासही वाढतो. थंडीच्या काळात वाढणाऱ्या धुक्याचा परिणाम प्रामुख्याने श्वसनसंस्थेवर होतो. त्यामुळे या काळात श्वसनासंबंधीचे आजार बळावतात. घशाला संसर्ग होतो. त्याचबरोबर, श्वसनसंस्थेला संसर्ग होण्याचा धोकाही अधिक असतो. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक त्रास होतो. मुंबईसारख्या शहरात धुरक्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मुंबईकरांनी सकाळी लवकर घराबाहेर पडताना नाक-तोंड झाकून बाहेर पडल्यास त्रास होणार नाही, असे मत श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. स्वप्निल कुलकर्णी यांनी मांडले. दमा असणाऱ्या रुग्णांना या काळात अधिक त्रास वाढतो. दम्याच्या त्रास असणाऱ्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. थंडी वाढायला सुरुवात झाल्यावर या रुग्णांनी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतली पाहिजे. थंडी लागू नये, म्हणून गरम कपडे घातले पाहिजेत. योग्य वेळी औषधे घेतली पाहिजेत, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. थंडीत सांधेदुखी त्रास बळावते. सकाळी उठल्यावर सांधे आखडण्याचा त्रास बऱ्याच जणांना होतो. हा त्रास टाळण्यासाठी सांधेदुखी असलेल्या व्यक्तींनी रोज व्यायाम करणे आवश्यक आहे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. (प्रतिनिधी)