शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

बहिष्कारामुळे ग्रामस्थ विठ्ठलदर्शनापासून वंचित

By admin | Updated: April 19, 2016 04:03 IST

राज्य शासनाने सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा संमत केला असला, तरीही अद्याप समाजाची या अनिष्ट प्रथेतून सुटका झालेली नाही.

महाड : राज्य शासनाने सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा संमत केला असला, तरीही अद्याप समाजाची या अनिष्ट प्रथेतून सुटका झालेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून जातपंचायती आणि वाळीत प्रकरणांमुळे चर्चेत आलेल्या रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पुन्हा एकदा असाच प्रकार उघडकीस आला आहे. येथील वलंग विठ्ठलवाडीवर टाकण्यात आलेल्या बहिष्कारामुळे ग्रामस्थांना गावातील विठ्ठल मंदिरात जाण्यापासूनही वंचित राहावे लागत आहे.९७ वर्षांपासून साजरा होणारा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होण्यापूर्वी एका समाजाच्या ओवळे गटाने २४ गावांत बोली निरोप देऊन बहिष्कार टाकल्याचे आदेश दिले. त्यामुळे सप्ताहात सलग तीन- चार दिवस आजूबाजूच्या गावातील कोणीही भक्त आले नसल्याने या सप्ताहावर बहिष्कार टाकल्याची कुणकुण लागली. हभप जनार्दन महाराज धाडवे हे या सप्ताहाचे प्रमुख मार्गदर्शक असून त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. उत्सव झाल्यानंतर याबाबत कायदेशीर तक्र ार करणार असल्याची भूमिका धाडवे यांनी व्यक्त केली. मुंबईस्थित जुईचे ग्रामस्थ दत्ता देवळे यांनी या सप्ताहावर बहिष्काराची बातमी समजल्यानंतर तडक विठ्ठलवाडी गाठली आणि तेथील ग्रामस्थांना धीर दिला. यापुढे जातपंचायतीची पद्धतच आपण बरखास्त करण्यासाठी समाजापुढे आग्रह धरू, अशी ग्वाही दत्ता देवळे यांनी विठ्ठलवाडी ग्रामस्थांना दिली. (वार्ताहर)