शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
3
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
5
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
6
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
7
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
8
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
9
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
10
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
11
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
12
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
13
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
14
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
15
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
16
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
17
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
18
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
19
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
20
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

दुष्काळ मदतकार्यांवर समित्या लक्ष ठेवणार

By admin | Updated: December 23, 2015 23:30 IST

दुष्काळग्रस्त भागांसाठी शासनाने ज्या उपाययोजना मंजूर केल्या आहेत त्याच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामस्तरापासून तर जिल्हास्तरापर्यंतच्या समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

नागपूर : दुष्काळग्रस्त भागांसाठी शासनाने ज्या उपाययोजना मंजूर केल्या आहेत त्याच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामस्तरापासून तर जिल्हास्तरापर्यंतच्या समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासंदर्भातील घोषणा विधानसभेत बुधवारी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली. त्यांनी सांगितले की, ग्रामस्तरावर सरपंच या समितीचे अध्यक्ष राहतील, तर तालुकास्तरावर पालकमंत्री किंवा शासनातर्फे नियुक्त अशासकीय सदस्याला अध्यक्षपद देण्यात येईल. त्याचप्रकारे जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षतेसाठी पालकमंत्री, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य यापैकी कुणाही एकाला अध्यक्षपद स्वीकारण्यास सांगण्यात येईल. याशिवाय समितीमध्ये इतर लोकांनाही सहभागी केले जाईल. खडसे यांनी सांगितले की, ही समिती दुष्काळग्रस्त भागांमध्ये शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या मदतकार्य किंवा योजनांची उदाहरणार्थ पाणीपुरवठा, रोजगार हमी योजना, चारा छावणी, जनावरांच्या देखभालीसह इतर विविध प्रकारच्या कामांवर लक्ष ठेवण्याचे कार्य करेल आणि सुधार करण्याच्या सूचनाही देईल. या समित्या स्थापन करण्याचा उद्देश दुष्काळग्रस्त भागांमध्ये सुरू असलेली कामे प्रभावीपणे अमलात यावीत, असा आहे. (प्रतिनिधी)