शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

दुष्काळ मदतकार्यांवर समित्या लक्ष ठेवणार

By admin | Updated: December 23, 2015 23:30 IST

दुष्काळग्रस्त भागांसाठी शासनाने ज्या उपाययोजना मंजूर केल्या आहेत त्याच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामस्तरापासून तर जिल्हास्तरापर्यंतच्या समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

नागपूर : दुष्काळग्रस्त भागांसाठी शासनाने ज्या उपाययोजना मंजूर केल्या आहेत त्याच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामस्तरापासून तर जिल्हास्तरापर्यंतच्या समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासंदर्भातील घोषणा विधानसभेत बुधवारी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली. त्यांनी सांगितले की, ग्रामस्तरावर सरपंच या समितीचे अध्यक्ष राहतील, तर तालुकास्तरावर पालकमंत्री किंवा शासनातर्फे नियुक्त अशासकीय सदस्याला अध्यक्षपद देण्यात येईल. त्याचप्रकारे जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षतेसाठी पालकमंत्री, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य यापैकी कुणाही एकाला अध्यक्षपद स्वीकारण्यास सांगण्यात येईल. याशिवाय समितीमध्ये इतर लोकांनाही सहभागी केले जाईल. खडसे यांनी सांगितले की, ही समिती दुष्काळग्रस्त भागांमध्ये शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या मदतकार्य किंवा योजनांची उदाहरणार्थ पाणीपुरवठा, रोजगार हमी योजना, चारा छावणी, जनावरांच्या देखभालीसह इतर विविध प्रकारच्या कामांवर लक्ष ठेवण्याचे कार्य करेल आणि सुधार करण्याच्या सूचनाही देईल. या समित्या स्थापन करण्याचा उद्देश दुष्काळग्रस्त भागांमध्ये सुरू असलेली कामे प्रभावीपणे अमलात यावीत, असा आहे. (प्रतिनिधी)