शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
2
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
3
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
4
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
5
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
6
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
7
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
8
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
9
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
10
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
11
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
12
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
13
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
14
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
15
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
16
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
17
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
18
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
19
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
20
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?

जलयुक्त शिवारमुळे होणार दुष्काळ निवारण!

By admin | Updated: July 12, 2016 00:50 IST

कारंजा येथे जलपूजनाचा कार्यक्रमात प्रख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी आशावाद व्यक्त केला.

कारंजा लाड (जि. वाशिम): जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलसंधारण करणे शक्य असून, या माध्यमातून दुष्काळी भागात पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो. ही योजना निराशेला आशेत परावर्तीत करणारा कार्यक्रम असून यामुळे दुष्काळ निवारणाचे कार्य होणार आहे, असे प्रतिपादन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांनी येथे सोमवार, ११ जुलै रोजी केले. कारंजा पंचायत समिती सभागृहात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत आयोजित जलपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, उपविभागीय महसूल अधिकारी शरद जावडे, तहसीलदार सचिन पाटील, जिल्हा परिषद सदस्य व शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, गटविकास अधिकारी डी.बी.पवार, कृषी अधिकारी समाधान धुळधुले , परिविक्षाधीन तहसीलदार रमेश जेंशवंत , डॉ.निलेश हेडा आदिंची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.राजेंद्रसिंह पुढे म्हणाले, की जलसंरचनेवर अतिक्रमण, नद्यांचे प्रदुषण, भूजलाचा पुनर्भरणापेक्षा अधिक प्रमाणात वापर आणि पाण्याच्या कमतरतेमुळे होणारे विवाद, या आजच्या प्रमुख समस्या आहेत. त्याचे निराकरण करण्यासाठी जलसाक्षरतेच्या माध्यमातून नदी प्रदूषण टाळणे आणि जलसंरचना ओळखून पाण्याचा योग्य वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.