शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
2
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
3
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
4
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
5
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
6
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
7
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
8
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
9
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
10
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
11
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
12
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
13
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
14
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
15
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
16
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
17
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
18
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
19
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
20
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ

सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर,१०५३ गावांचा समावेश

By admin | Updated: March 9, 2016 17:17 IST

दुष्काळाचा फटका बसलेल्या रब्बी हंगामातील १०५३ गावात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

महसूलमंत्री एकनाथ खडसेंची घोषणा
ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ९ - दुष्काळाचा फटका बसलेल्या रब्बी हंगामातील १०५३ गावात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून इतिहासात प्रथमच रब्बी हंगामासाठी अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील ६४५ तर अहमदनगरमधील ४०८ गावांचा समावेश करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत दिली. 
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महसूल मंत्री खडसे यांनी विधान परिषदेत याबाबतचे निवेदन केले. मंगळवारी रात्री झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून या दुष्काळी गावांमध्ये सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्याचे खडसे यांनी सांगितले.
अपु-या पावसामुळे राज्यातील शेतीला मोठा फटका बसला असून यापूर्वीच खरीपातील १५ हजार ७४७ गावात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तर रब्बी हंगामालाही दुष्काळाचा फटका बसला असून ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असणा-या १०५३ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करुन विविध उपाययोजना करण्यात येतील. या सर्व गावांमध्ये जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्ज वसुलीस स्थगिती, वीज बिलात ३३.५ टक्के सूट, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात माफी, चारा डेपो वा छावण्या, आवश्यक तेथे पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, शेत पंपांची वीज जोडणी खंडित न करणे आणि रोहयो कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. खरीपातील शेतपिकांच्या नुकसानीपोटी सुमारे २५०० कोटींची मदत 
शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. येत्या काळात आणखी २ हजार कोटींची मदत केली जाणार आहे. 
दरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणात दुष्काळाचा उल्लेखच करण्यात आला नसल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे यांनी केला. यावर राज्यपालांच्या भाषणात दुष्काळाचा उल्लेख आहे. भाषणादरम्यान गोंधळ घातला नसता तर ऐकू आले असते, असा टोला खडसे यांनी लगावला.