शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

दुष्काळी भागासाठी वेगळा विचार करावा

By admin | Updated: August 17, 2015 00:40 IST

राज्यात मराठवाडा आणि खान्देशात दुष्काळाची दाहकता अधिक आहे. त्यामुळे या भागातील दुष्काळग्रस्तांसाठी शासनाने वेगळा विचार करुन भरीव

परभणी : राज्यात मराठवाडा आणि खान्देशात दुष्काळाची दाहकता अधिक आहे. त्यामुळे या भागातील दुष्काळग्रस्तांसाठी शासनाने वेगळा विचार करुन भरीव तरतूद करावी, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.मराठवाड्यातील दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर असलेल्या पवार यांनी रविवारी येथे दुष्काळ परिषद घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मराठवाड्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि शासनाचा दुटप्पीपणा याची माहिती दिली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाड्यात आगामी काळात उद्भवणारी दुष्काळी परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि या संकटाचा सामना करण्यासाठी पाऊले उचलण्यासाठी सांगितले होते. मात्र अडीच महिन्यांत शासनाने काहीही केले नाही. त्यामुळे सध्या गंभीर परिस्थिती ओढवली आहे.कर्ज पुनर्गठण, विम्याचे वितरण याबाबत शासन कुठलेही धोरण अवलंबत नाही. आगामी काळात पाऊस पडला नाही तर पाण्याची स्थिती गंभीर होणार आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळग्रस्त भागासाठी वेगळा विचार करुन तत्काळ पाऊले उचलावीत, चारा छावण्या सुरु कराव्यात, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, तसेच मनरेगाच्या धोरणात बदल करण्याची मागणी त्यांनी केली. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर मनगरेगातून काम करण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)