शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

दुष्काळाचा मुद्दा विधिमंडळात उचलणार!

By admin | Updated: March 5, 2016 02:55 IST

विखे पाटील यांचा अकोला, वाशिम जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा.

अकोला: दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच असून, शेतकर्‍यांना दिलासा मिळेल, यासाठी सरकारकडे कोणतेच धोरण नसल्याची टीका करीत विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुष्काळासह रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसंदर्भात सरकारला जाब विचारण्याचा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दिला. विखे पाटील यांनी शुक्रवारी अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला. दुष्काळात शेतकरी, जनता होरपळत असताना, जनतेच्या मागे विश्‍वासाने उभे राहणे गरजेचे आहे; मात्र मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हय़ाधिकार्‍यांकडून आढावा घेऊन शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करीत असल्याचे टीकास्त्र विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर डागले. पिके हातची गेली, उत्पन्न नाही, हातात पैसा नाही, कर्जापायी कंटाळलेले शेतकरी आत्महत्या करीत असताना भाजपाचे खासदार त्यांचा उपहास करतात, टिंगल उडवतात. मराठवाड्यातील गावंच्या गावं (पान १ वरुन) अन्नाच्या शोधासाठी स्थलातंरित होत आहेत. अशावेळी शेतकर्‍यांचा उपहास, टिंगल करणार्‍या भाजप खासदारांची बौद्धिक दिवाळखोरी समोर येत आहे. दुष्काळी भागातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाल्याशिवाय काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा निर्धारही त्यांनी अकोला जिल्ह्याच्या दौर्‍याप्रसंगी केला. अकोला जिल्ह्यातील किनखेड, गांधीग्राम आणि बाभूळगाव आदी गावांना भेट देऊन त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. वाशिम जिल्ह्यातील मेडशीनजिकची आदिवासी गावं कोळदरा आणि वाकळवाडी येथे विखे पाटील यांनी शेतकरी व विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मेडशी येथे त्यांनी दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाईबाबत शेतकर्‍यांशी संवाद साधला. जनतेला एक हंडा पाण्यासाठी पायपिट करावी लागत आहे. चार्‍याअभावी जनावरे मृत्यूमुखी पडत आहेत आणि सरकारने झोपेचे सोंग घेतले असल्याची टिका त्यांनी यावेळी केली. हे सरकार शेतकर्‍यांचे नसून उद्योगपतींचे आहे. शेतकर्‍यांचे कर्ज माफ होत नाही; मात्र उद्योगपतींची हजारो कोटी रूपयांची कर्ज माफ केली जातात, असा आरोप त्यांनी केला.चारा छावण्या बंद; लावण्या सुरूराज्यात, मराठवाड्यात पाणी, चार्‍यावाचून गुरे दगावत असताना, राज्य शासनाने चारा छावण्या बंद केल्या असून, लावण्या सुरू केल्या (डान्स बार) आहेत. डान्स बार बंद करण्यास कायद्यात काय बदल करायचे ते करावेत, यासाठी काँग्रेस सरकारच्या सोबत असेल, पण सरकारने या बाबतीत मौन धारण केले असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला.