शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

‘दुष्काळी’ गावांवर ‘सुलतानी’ संकट !

By admin | Updated: January 13, 2016 04:26 IST

अंतिम पैसेवारीनंतर दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झालेल्या राज्यातील १२ हजार वाढीव गावांना मदत देण्यास ‘एनडीआरएफ’ने (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) नकार दिला आहे.

- राजेश निस्ताने,  यवतमाळ

अंतिम पैसेवारीनंतर दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झालेल्या राज्यातील १२ हजार वाढीव गावांना मदत देण्यास ‘एनडीआरएफ’ने (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) नकार दिला आहे. त्यामुळे या गावांच्या आर्थिक मदतीची व्यवस्था करायची कोठून, असा पेच युती सरकारपुढे निर्माण झाला आहे. खरीप हंगाम बुडाल्याने राज्य सरकारने १५ हजार ७४७ गावांसाठी ३ हजार ५७८ कोटींच्या दुष्काळी मदतीची मागणी केंद्राकडे नोंदविली होती. यातील २ हजार कोटींचा पहिला टप्पा प्राप्त झाला. सर्वत्र दुष्काळी स्थिती असताना २० आॅक्टोबरच्या नजरअंदाज पैसेवारीनुसार निवडकच गावांना मदत दिली गेली. वास्तविक, अंतिम पैसेवारीनंतर दुष्काळग्रस्त गावांची संख्या तब्बल १२ हजारांनी वाढून २७ हजारांवर पोहोचली. या गावांची पीक पैसेवारी ५० पैशाच्या आत निघाली. पर्यायाने ही गावेही दुष्काळी मदतीसाठी पात्र ठरली आहेत.‘एनडीआरएफ’ला पैसेवारी अमान्यकेंद्र शासनाच्या ‘एनडीआरएफ’ने आता उर्वरित वाढीव १२ हजार गावांबाबत हात वर केले आहेत. पहिल्यांदा ५० टक्क्यापेक्षा कमी पीक पैसेवारी निघालेली गावेच एनडीआरएफला मान्य आहेत. नंतर समाविष्ट गावे ही प्रशासनावर राजकीय दबाव आणून दुष्काळ दाखविण्याचा प्रयत्न असल्याचा त्यांना संशय आहे. विशेष म्हणजे, राज्य शासनातील महसूल, पुनर्वसन सचिवांनीही ‘एनडीआरएफ’च्या सुरात सूर मिसळला असल्याचे समजते.वैदर्भीय शेतकऱ्यांना फटकाएनडीआरएफ व सचिवांची दुष्काळी मदतीच्या मुद्द्यावर ‘एकजूट’ पाहता १२ हजार गावांमधील लाखो शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीपासून वंचित राहावे लागण्याची चिन्हे आहेत.मदतीसाठी ‘एसडीआरएफ’चा पर्यायराज्याच्या तिजोरीतून, अर्थात एसडीआरएफमधून (राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) निधीची तरतूद करणे अथवा एनडीआरएफ आणि केंद्र शासनाला १२ हजार गावे दुष्काळी यादीत का वाढली हे पटवून देणे हेच पर्याय युती शासनापुढे दिसत आहेत.कापूस उत्पादकांना वगळले‘एनडीआरएफ’ने विदर्भात ७५ टक्क्यांवर पर्जन्यवृष्टीचे कारण पुढे करून दुष्काळी मदतीच्या पहिल्या टप्प्यातून कापूस उत्पादकांनाच वगळले.महसूलमंत्र्यांच्या क्षेत्रात अधिक निधीराज्याचे महसूल व मदत-पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी आपले प्रभाव क्षेत्र असलेल्या बुलडाणा व जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळी मदतनिधी खेचून नेला. बुलडाण्याचे ते पालकमंत्री असल्याने तेथे पहिल्याच टप्प्यात १८३ कोटी ८३ लाख तर जळगाव या गृह जिल्ह्यात १०५.२७ कोटींचा निधी नेला.आणेवारीत नव्याने समाविष्ट गावांना दुष्काळी मदत देण्यास ‘एनडीआरएफ’ने नकार दिला आहे. सचिवस्तरीय अधिकारीही तीच भाषा बोलू लागले आहेत. यासंदर्भात १४ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होत आहे. त्यात ठोस काही तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. - संजय राठोड, महसूल राज्यमंत्री