शहरं
Join us  
Trending Stories
1
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
2
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
3
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
4
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
5
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग्ज बदलून राहा सेफ
6
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
7
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
8
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
9
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
10
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
11
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
12
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
13
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
14
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
15
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
16
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
17
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
18
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
19
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
20
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

‘दुष्काळी’ गावांवर ‘सुलतानी’ संकट !

By admin | Updated: January 13, 2016 04:26 IST

अंतिम पैसेवारीनंतर दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झालेल्या राज्यातील १२ हजार वाढीव गावांना मदत देण्यास ‘एनडीआरएफ’ने (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) नकार दिला आहे.

- राजेश निस्ताने,  यवतमाळ

अंतिम पैसेवारीनंतर दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झालेल्या राज्यातील १२ हजार वाढीव गावांना मदत देण्यास ‘एनडीआरएफ’ने (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) नकार दिला आहे. त्यामुळे या गावांच्या आर्थिक मदतीची व्यवस्था करायची कोठून, असा पेच युती सरकारपुढे निर्माण झाला आहे. खरीप हंगाम बुडाल्याने राज्य सरकारने १५ हजार ७४७ गावांसाठी ३ हजार ५७८ कोटींच्या दुष्काळी मदतीची मागणी केंद्राकडे नोंदविली होती. यातील २ हजार कोटींचा पहिला टप्पा प्राप्त झाला. सर्वत्र दुष्काळी स्थिती असताना २० आॅक्टोबरच्या नजरअंदाज पैसेवारीनुसार निवडकच गावांना मदत दिली गेली. वास्तविक, अंतिम पैसेवारीनंतर दुष्काळग्रस्त गावांची संख्या तब्बल १२ हजारांनी वाढून २७ हजारांवर पोहोचली. या गावांची पीक पैसेवारी ५० पैशाच्या आत निघाली. पर्यायाने ही गावेही दुष्काळी मदतीसाठी पात्र ठरली आहेत.‘एनडीआरएफ’ला पैसेवारी अमान्यकेंद्र शासनाच्या ‘एनडीआरएफ’ने आता उर्वरित वाढीव १२ हजार गावांबाबत हात वर केले आहेत. पहिल्यांदा ५० टक्क्यापेक्षा कमी पीक पैसेवारी निघालेली गावेच एनडीआरएफला मान्य आहेत. नंतर समाविष्ट गावे ही प्रशासनावर राजकीय दबाव आणून दुष्काळ दाखविण्याचा प्रयत्न असल्याचा त्यांना संशय आहे. विशेष म्हणजे, राज्य शासनातील महसूल, पुनर्वसन सचिवांनीही ‘एनडीआरएफ’च्या सुरात सूर मिसळला असल्याचे समजते.वैदर्भीय शेतकऱ्यांना फटकाएनडीआरएफ व सचिवांची दुष्काळी मदतीच्या मुद्द्यावर ‘एकजूट’ पाहता १२ हजार गावांमधील लाखो शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीपासून वंचित राहावे लागण्याची चिन्हे आहेत.मदतीसाठी ‘एसडीआरएफ’चा पर्यायराज्याच्या तिजोरीतून, अर्थात एसडीआरएफमधून (राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) निधीची तरतूद करणे अथवा एनडीआरएफ आणि केंद्र शासनाला १२ हजार गावे दुष्काळी यादीत का वाढली हे पटवून देणे हेच पर्याय युती शासनापुढे दिसत आहेत.कापूस उत्पादकांना वगळले‘एनडीआरएफ’ने विदर्भात ७५ टक्क्यांवर पर्जन्यवृष्टीचे कारण पुढे करून दुष्काळी मदतीच्या पहिल्या टप्प्यातून कापूस उत्पादकांनाच वगळले.महसूलमंत्र्यांच्या क्षेत्रात अधिक निधीराज्याचे महसूल व मदत-पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी आपले प्रभाव क्षेत्र असलेल्या बुलडाणा व जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळी मदतनिधी खेचून नेला. बुलडाण्याचे ते पालकमंत्री असल्याने तेथे पहिल्याच टप्प्यात १८३ कोटी ८३ लाख तर जळगाव या गृह जिल्ह्यात १०५.२७ कोटींचा निधी नेला.आणेवारीत नव्याने समाविष्ट गावांना दुष्काळी मदत देण्यास ‘एनडीआरएफ’ने नकार दिला आहे. सचिवस्तरीय अधिकारीही तीच भाषा बोलू लागले आहेत. यासंदर्भात १४ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होत आहे. त्यात ठोस काही तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. - संजय राठोड, महसूल राज्यमंत्री