शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

दुष्काळदाह : गणवेशासाठी शेतकऱ्याच्या मुलाची आत्महत्या

By admin | Updated: November 23, 2015 03:15 IST

सततच्या नापिकीमुळे आपल्या शिक्षणासाठी कुटुंबाकडे पैसे नसल्याचे पाहून, चिंतातुर झालेल्या बाळापूर तालुक्यातील नववीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली.

रिधोरा (अकोला) : सततच्या नापिकीमुळे आपल्या शिक्षणासाठी कुटुंबाकडे पैसे नसल्याचे पाहून, चिंतातुर झालेल्या बाळापूर तालुक्यातील नववीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. बाळापूर तालुक्यातील दधम येथे विश्वनाथ खुळे हे पत्नी व दोन मुलांसह राहतात. मोठा मुलगा वैभव हा इयत्ता अकरावीत शिकत असून, लहान मुलगा विशाल हा अकोला येथील महाराणा प्रताप विद्यालयात नववीच्या वर्गात शिकत होता. खुळे कुटुंबाकडे दोन एकर शेती आहे. सलग दोन वर्षांच्या नापिकीमुळे मशागत व लागवडीचा खर्चही निघाला नाही. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच आर्थिक संकटात सापडले. कुटुंबीय आपल्या शिक्षणासाठी पैसे कोठून आणतील, आपले शिक्षण पूर्ण होईल की नाही, अशा विवंचनेत असलेल्या विशालने नैराश्यातून रविवारी सकाळी विषारी औषध प्राशन केले. (वार्ताहर)दिवाळीपूर्वीपासून धरला होता गणवेशासाठी हट्टविशालने दिवाळीपूर्वीपासूनच गणवेश आणि पाठ्यपुस्तकांसाठी कुटुंबीयांकडे हट्ट धरला होता. मात्र पैसेच नसल्याने त्याचा हट्ट पूर्ण होत नव्हता. त्याला काही पुस्तके मिळाली होती. उर्वरित पुस्तकांसाठी त्याने कुटुंबीयांकडे आग्रह धरला होता. डोक्यावर ४० हजार रुपयांचे कर्जविशालचे वडील विश्वनाथ यांनी शेतीसाठी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेकडून ४० हजार रुपयांचे कर्ज काढले. मात्र सततच्या नापिकीमुळे कर्ज फेडता आलेले नाही.नापिकीमुळे जवळ पैसा नाही. त्यामुळे दसरा-दिवाळीसारखे सणही कुटुंबीय साजरे करू शकले नाहीत. मुलांना शिक्षित करण्यासाठी पैसा कोठून आणावा, असा प्रश्न त्यांना भेडसावत होता. सततच्या नापिकीमुळे विशालच्या शिक्षणात अडथळा येत होता. त्यामुळे तो निराश झाला. त्याच्या बोलण्यातूनही निराशा जाणवत होती. या निराशेतूनच त्याने जीवन संपविले. - विश्वानाथ खुळे, विशालचे वडील