शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

चांगल्या दिवसांचे स्वप्न भंगले

By admin | Updated: June 24, 2014 00:33 IST

भाजपाने दाखविलेल्या चांगल्या दिवसांचे स्वप्न भंगले आहे.

नामदेव मोरे - नवी मुंबई
भाजपाने दाखविलेल्या चांगल्या दिवसांचे स्वप्न भंगले आहे. मागील तीन महिन्यांत फ्लॉवर चार पट, कोबी तीन पट तर कांद्यासह इतर प्रमुख भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. वाढत्या महागाईमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे. 
महागाई कमी होणार, सर्वाना चांगले दिवस  येणार, असे आश्वासन देऊन भाजपाने केंद्रात एकहाती सत्ता मिळविली. परंतु प्रत्यक्षात मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडू लागल्या आहेत. आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी स्थिर असणारे बाजारभाव मागील तीन महिन्यांत मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. मार्चमध्ये मुंबई बाजार समितीच्या होलसेल मार्केटमध्ये प्रति किलो 3 ते 5 रुपये किमतीला विकला जाणारा फ्लॉवर आता 14 ते 18 रुपयांवर गेला आहे. कोबी प्रति किलो 3 ते 5 वरून 1क् ते 14 वर गेली आहे. कांदा 7 ते 11 वरून 14 ते 21 वर गेला आहे. घेवडा, टोमॅटो, वांगी, कोथिंबीर सर्वाचेच दर मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये भाव कित्येक पटीने जास्त आहेत. पाव किलो भाजीसाठी 15 ते 2क् रुपये मोजावे लागतात. कांद्याचे नवीन पीक बाजारात येण्यासाठी अजून तीन महिने अवकाश आहे. शासनाने योग्य उपाय केले नाही तर दर भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजीपाल्याचे दरही आहे तसेच राहण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत. 
 
तीन महिन्यांमधील भाजीपाल्याच्या बाजारभावाची माहिती
वस्तू 22 मार्च23 जूनकिरकोळ
कांदा7 ते 1114 ते 2125 ते 28
फ्लॉवर3 ते 514 ते 1855 ते 6क्
कोबी3 ते 51क् ते 144क् 
दुधी भोपळा6 ते 1216 ते 184क् 
घेवडा2क् ते 244क् ते 447क् ते 8क्
शेवगा शेंग14 ते 2636 ते 5क्8क् ते 1क्क्
वांगी4 ते 1216 ते 3क्4क् ते 48
फरसबी3क् ते 4क् 6क् ते 758क्  ते 9क्
गवार3क् ते 4क् 3क् ते 5क्6क् ते 72
बटाटा11 ते 1415 ते 1925 ते 28
 
कांदा सरकारच्या 
डोळ्यांतूनही पाणी काढणार
कांद्याचे दर गगनाला भिडू लागले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये हे दर 28 वर गेले आहेत. पुढील तीन महिन्यांमध्ये यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता व्यापा:यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी कांद्याच्या दरामुळे दिल्लीत भाजपाला सत्ता गमवावी लागली होती. अद्याप तेथे पुन्हा सत्ता मिळविता आलेली नाही. दरवाढ रोखण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या नाहीत, तर कांदा आता ग्राहकांना रडवतोय; आणि अशीच स्थिती राहिली तर सरकारच्या डोळ्यांतूनही पाणी काढेल, अशी प्रतिक्रिया काही व्यापा:यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.