शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची स्वप्नभूमी नष्ट होवू देणार नाही

By admin | Updated: April 15, 2017 01:45 IST

समृध्दी महामार्गाच्या विरोधातील लढाई कोणा एकाची नसून ती सर्वांची आहे. शेतकऱ्यांची स्वप्नभूमी नष्ट होवू देणार नाही, असे सांगत सरकार सोबत असहकार करण्याचे

सिन्नर (नाशिक) : समृध्दी महामार्गाच्या विरोधातील लढाई कोणा एकाची नसून ती सर्वांची आहे. शेतकऱ्यांची स्वप्नभूमी नष्ट होवू देणार नाही, असे सांगत सरकार सोबत असहकार करण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले.समृध्दी महामार्गााला विरोध करण्यासाठी सिन्नर तालुक्यातील शिवडे गाव एकवटले असून समृध्दी विरोधातील आंदोलनाचे हे गाव केंद्रबिंदू झाले आहे. त्यापार्श्वभूमीमुळे शिवडे येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.जे आज सुपात आहेत ते उद्या जात्यात राहतील. त्यामुळे समृध्दी महामार्गात ज्याची जमीन जात नाही अशा शेतकऱ्यांनीही या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले. शेतकऱ्यांमध्ये आत्तापर्यंत भेद पाडून दुसऱ्यांनी फायदा करुन घेतला आहे. प्रत्येक शेतकऱ्यांवर ही वेळ येणार आहे. त्यामुळे एकजुटीने लढा उभारा, असे आवाहन त्यांनी केले. समृध्दी शब्द जसा मोठा आहे तसे त्याचे लाभधारकही मोठे असल्याचा टोला शेट्टी यांनी लगावला. २६ तारखेच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांना भेटून समृद्धीबाबत शेतकऱ्यांचा असंतोष मांडणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ऐकले नाही तर शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी उभा राहील, असेही शेट्टी यांनी सांगितले. (वार्ताहर)