डोंबिवली : शहरात मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे वाहतूक मंदावली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच डांबरीकरण झालेल्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. काँक्रिटीच्या रस्त्यांवर लावलेले पेव्हर ब्लॉक काही ठिकाणी निखळले आहेत. तर काही ठिकाणी ते खचले आहेत. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांचे कंबरडेच मोडण्याची भिती आहे. खड्ड्यांमध्ये रिक्षा, दुचाकींचे टायर अडकत असल्याने अपघाताच्या घटनाही वाढल्या आहेत.पूर्वेतील मानपाडा, बालभवन, शिवमंदिर, केळकर रोड, चार रस्ता, फडके रोड, शेलार चौक, एमआयडीसी निवासी विभाग आदी ठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळ््यापूर्वी डांबरीकरण झालेल्या रस्त्याही खड्डेमय झाले आहेत. काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यांच्या कडेला, चौका-चौकांत पेव्हर ब्लॉक लावण्यात आले आहेत. काँक्रीट व पेव्हर ब्लॉक योग्य पद्धतीने जोडण्यात न आल्याने तेथे पाणी मुरत आहे. परिणामी पेव्हर ब्लॉक निखळले आहेत. काही ठिकाणी खड्डे बुजवण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा वापरले आहेत. तेही अस्ताव्यत होत आहेत. त्यात रिक्षा, दुचाकी, व मोटारींची चाके अडकत आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. शिवाय वाहतूक कोंडीत भर पडत आहे. केळकर रोडवरील डबर-दगड पावसाने पुन्हा बाहेर आले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. रेती रस्त्यावर येत असल्याने वाहने घसरण्याच्या घटना वाढल्या आहेत. रस्त्यांची काम योग्य पद्धतीने न झाल्याने चौकशी करावी, कंत्राटादाराकडून पुन्हा कामे करून घ्यावीत, दोषी कंत्राटादारांना काळ््या यादीत टाकावे. पालिकेच्या अभियंत्यांनी वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
खड्ड्यांमुळे कंबरडे मोडण्याची भीती
By admin | Updated: July 1, 2016 03:42 IST