शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मराठा आरक्षणावरून भाजपा कार्यकारिणीत नाट्य

By admin | Updated: October 7, 2016 05:31 IST

भाजपा कार्यसमितीच्या बैठकीत मराठा आरक्षणावर ठराव मांडण्यावरून बरेच नाट्य् रंगले. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे मराठा आरक्षणाबाबतचा ठराव मांडणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत होते

मुंबई : भाजपा कार्यसमितीच्या बैठकीत मराठा आरक्षणावर ठराव मांडण्यावरून बरेच नाट्य् रंगले. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे मराठा आरक्षणाबाबतचा ठराव मांडणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत होते. मात्र, पंकजा यांनी बैठकीलाच दांडी मारल्याने ऐनवेळी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना हा ठराव मांडावा लागला.भाजपा कार्यसमितीची दोन दिवशीय बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणाचा ठराव मांडला गेला. मात्र, ठरावाचा मसुदा अत्यंत मोघम ठेवण्यात आला. या ठरावात मराठा समाजास शिक्षण व नोकरीत १६ टक्के आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, त्याचबरोबर हे आरक्षण ओबीसींच्या विद्यमान आरक्षणाहून वेगळे असायला हवे व अनुसूचित जाती आणि जमातींसाठी असलेल्या आरक्षणासही त्यामुळे धक्का लागता कामा नये, असे त्यात नमूद केले आहे. शिवाय, आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घातलेले बंधनही (कमाल ५० टक्के) पाळले जावे, असे हा ठराव म्हणतो.मराठा आरक्षणाचा ठराव मांडण्यावरूनही बैठकीत राजकीय नाट्य रंगले. हा ठराव मंत्री पंकजा मुंडे मांडणार असल्याचे सांगण्यात आले होते, पण त्यांनी नेमक्या वेळी बैठकीकडे पाठ फिरवल्याने ऐन वेळी हा ठराव मांडण्याची जबाबदारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आली. ओबीसींच्या नेत्या अशी पंकजा यांची ओळख सर्वश्रुत आहे.कार्यसमितीच्या बैठकीत मराठा आरक्षणासह राजकीय आणि शेतीविषयक ठराव संमत करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांना दिली. राज्यात मुस्लीम आरक्षणाची मागणी जोर धरत असून, मोर्चांची तयारी सुरू आहे. त्यामुळे मुस्लीम आरक्षणाला पाठिंबा देणार का, असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर काहीसे नाराज झालेल्या दानवे यांनी धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नसल्याचे स्पष्ट केले.मराठा समाजाच्या आजच्या स्थितीला १५ वर्षे सत्तेत असणारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी जबाबदार आहे. हे मागासलेपण दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असते, तर प्रश्न निर्माण झाले नसते. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आघाडीच्या नेत्यांना जाग आली. भाजपा मात्र, मराठा आरक्षणाला कटिबद्ध आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविला जाईल, असे दानवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)