शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

नाले साफ नाहीच...मुंबई तुंबणार

By admin | Updated: May 31, 2016 03:34 IST

मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी प्रामुख्याने नाल्यांच्या सफाईचे काम पूर्ण करण्यासाठी शेवटचे २४ तास उरले आहेत़ गेल्या वर्षी नाल्यांच्या सफाईत भ्रष्टाचार झाल्याचे उजेडात आले़ याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर

शेफाली परब-पंडित,  मुंबईमान्सूनपूर्व कामे करण्यासाठी प्रामुख्याने नाल्यांच्या सफाईचे काम पूर्ण करण्यासाठी शेवटचे २४ तास उरले आहेत़ गेल्या वर्षी नाल्यांच्या सफाईत भ्रष्टाचार झाल्याचे उजेडात आले़ याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर यंदातरी ठेकेदार नालेसफाईची कामे चोख बजावतील, अशी खबरदारी महापालिकेने घेणे अपेक्षित होते़ मात्र ‘लोकमत’ने गेल्या पाच दिवसांमध्ये या कामांचा पंचनामा केला असता परिस्थिती जैसे थेच असल्याचे दिसून आले़ या मालिकेची दखल घेऊन सत्ताधारी व विरोधी पक्षांनीही प्रशासनाला जाब विचारला़ पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये एकमत झाले आहे, ते म्हणजे यंदा नाले भरून मुंबईची ‘तुंबापुरी’ होणार यावऱ मात्र या वेळेस विरोधकांबरोबरच सत्तेतील मित्रपक्ष भाजपानेही शिवसेनेवर शरसंधान केले आहे़ नाल्यांमधून वर्षभर टप्प्याटप्प्याने गाळ काढण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे़ मात्र या निर्णयाचा पहिल्याच वर्षी बाजा वाजला आहे़ जानेवारी महिन्यात नाल्यांच्या सफाईला सुरुवात होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात गाळ काढण्याच्या कामाला एप्रिलनंतर वेग आला़ यात ठेकेदार मिळत नसल्याने छोट्या नाल्यांची सफाई विभागस्तरावर सुरू आहे़ मात्र नाल्यांतून काढलेला गाळ टाकायचा कुठे या विवंचनेतच महिना उलटला़ ठेकेदार मुंबईबाहेरील कचराभूमीची बनावट ना हरकत प्रमाणपत्रे आणत असल्याने या वेळी पालिकेनेच नऊ जागा शोधून काढल्या आहेत़ नाल्यांमधून काढलेला गाळ या भूखंडांवर टाकण्यात येतो आहे का, याची खातरजमा करण्यासाठी स्थायी समितीची उप समितीही नेमली आहे़ मात्र हे शहाणपण पालिकेला सुचेपर्यंत महत्त्वाचा वेळ वाया गेला़ त्यामुळे कचरा, डेब्रिज, प्लॅस्टिकने भरलेले नाले मुंबईला यंदाच्या पावसाळ्यात जलमय करण्यासाठी सज्ज आहेत़ दरवर्षी नालेसफाईचे पाहणी दौरे म्हणजे राजकीय जत्राच असते़ यंदादेखील याहून वेगळी परिस्थिती नाही़ पुढचे वर्ष निवडणुकीचे असल्याने राजकीय चिखलफेक रंगात आली आहे़ मात्र या वेळेस मित्रपक्षानेही साथ सोडल्यामुळे सत्तेवर असूनही शिवसेना एकटी पडली आहे़ काँग्रेस नालेसफाईचे बिंग फोडण्याच्या तयारीत आहे; तर राष्ट्रवादीने शिवसेना-भाजपा नेत्यांच्या घरासमोर गाळ टाकण्याचा इशारा दिला आहे़ मित्रपक्ष भाजपाने यापुढे जाऊन नालेसफाईचे १२ वाजण्यास शिवसेनेलाच जबाबदार धरले आहे़ त्यामुळे शिवसेनेनेही नालेसफाई अपूर्ण असल्याची सावध भूमिका घेतली आहे़शिवसेनाही म्हणते, नाले साफ नाहीच!नाल्यांची सफाई ज्या पद्धतीने होणे अपेक्षित आहे तशी झालेली नाही़ धारावी अंतर्गत छोटे नाले विभागस्तरावर साफ होणे अपेक्षित आहे़ याबाबत अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्याशी चर्चा केली आहे़ त्यांनी विभाग अधिकाऱ्यांना बोलावून घेतले आहे़ माझ्या वॉर्डातील किस्मतनगर नाला साफ झालेला नाही़ नालेसफाईची काही कामे अद्याप बाकी आहेत़- तृष्णा विश्वासराव (सभागृह नेत्या) शिवसेना प्रशासन व सत्ताधारी नापासनाल्यांची सफाई झालेलीच नाही़ ‘लोकमत’ने केलेला पंचनामा बरोबर आहे़ धारावीतील नाल्यांची सफाई झालेलीच नाही़ हे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे अपयश असून, पावसाळ्यात मुंबई तुंबणाऱ- संदीप देशपांडे (गटनेते, मनसे)शिवसेनाच जबाबदारमुंबईमध्ये नाल्यांच्या सफाईला सुरुवात तर झाली़ पण नाले साफ झालेले नाहीत़ नालेसफाईची कामे मोठ्या प्रमाणात अपूर्ण आहेत़ नाल्यांची सफाई केवळ कागदोपत्री झाली आहे़ त्यामुळे मुंबईत पाणी भरणाऱ यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरच शिवसेनाही जबाबदार आहे़ नालेसफाईतील भ्रष्टाचाराविरोधात भाजपानेच सर्वप्रथम आवाज उठविला होता़ आम्ही सत्तेत सहभागी पक्ष आहोत; पण सत्ताधारी शिवसेनाच असल्याने तेच या अपयशासाठी कारणीभूत आहेत़ - भालचंद्र शिरसाट (भाजपा प्रवक्ते)करून नाही, नाले भरून दाखविलेपावसाळ्याच्या एक महिन्याआधीच नाले साफ होतील, असा दावा प्रशासनाने केला होता़ आपले कार्यकर्ते रस्त्यावर उतरून भरलेल्या नाल्यांची सफाई करून घेतील, अशी घोषणाबाजी करणाऱ्या शिवसेनेने करून नाही, नाले भरून दाखविले़ तुंबलेले नाल्यांचे सत्य ‘लोकमत’ने लोकांसमोर आणले़ जे काम एका वृत्तपत्राने केले, ते सत्ताधारी व अधिकाऱ्यांना का जमले नाही? शिवसेना-भाजपा युतीच्या निष्क्रिय कारभारामुळे मुंबई यंदा तुंबणाऱ- प्रवीण छेडा (विरोधी पक्षनेते)कुरघोडीच्या राजकारणाचा फटका‘लोकमत’ने केलेला पंचनामा हे नालेसफाईचे वास्तव आहे़ नाल्यांची सफाई अजिबात झालेली नाही़ शिवसेना-भाजपा युतीमधील कुरघोडीचा फटका नाहक मुंबईकरांना बसणार आहे़ नालेसफाईसाठी खर्च केलेले सव्वाशे कोटी रुपये पाण्यात जाण्याची चिन्हे आहेत़ यंदाच्या पावसाळ्यात मुंबई तुंबणार यात शंकाच नाही़ मात्र तसे झाल्यास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाल्यांमधील गाळ काढून शिवसेना-भाजपा नेत्यांच्या कार्यालयासमोर व घरासमोर टाकतील़-धनंजय पिसाळ (गटनेते,राष्ट्रवादी काँग्रेस)