शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

डहाणूच्या किनारपट्टीवर प्लास्टिकला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2016 03:50 IST

डहाणू तालुक्याचा समुद्रकिनारा सध्या प्लास्टिक पिशव्यांनी व्यापला असून जिकडे तिकडे कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने किनाऱ्याचे विद्रुपीकरण झाले

अनिरुद्ध पाटील,

डहाणू/बोर्डी- डहाणू तालुक्याचा समुद्रकिनारा सध्या प्लास्टिक पिशव्यांनी व्यापला असून जिकडे तिकडे कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने किनाऱ्याचे विद्रुपीकरण झाले आहे. त्यामुळे विकेंडला समुद्री पर्यटनासाठी आलेल्या परगावातील पर्यटकांचा हिरमोड होत आहे. या अवकळेमुळे स्थानिक मच्छीमार, पर्यावरणप्रेमी आणि व्यायामाला येणाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. डहाणू तालुक्याला ३५ किमी लांबीची समुद्रकिनारपट्टी लाभली आहे. रुपेरी वाळू, कांदळवन आणि किनाऱ्याला लाभलेली नारळाच्या झाडांची झालर या निसर्गसौंदर्याने समुद्री पर्यटन स्थळांमध्ये डहाणूला विशेष पसंती दिली जाते. बोर्डीसह घोलवड, चिखले, नरपड, आगर आणि पारनाका या चौपट्यांवर पर्यटकांची गर्दी दिसून येते. सध्या पावसाळा सुरू असल्याने धबधबे पर्यटकांना आकर्षित करीत असले तरीही विकेंडला समुद्री पर्यटनाचा ओघ ओसरलेला नाही. मात्र नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे पुरासह प्लास्टीक समुद्रात वाहून गेले आणि मागील आठवड्यापासून भरतीच्या पाण्यासह किनाऱ्यावर कचरा साचण्यास सुुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून रविवारी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला.व्यायामाकरिता येणाऱ्या नागरिकांची संख्याही घटू लागल्याचे चिखले गावातील समुद्रकाष्ठ मित्र मंडळाच्या अशोक गावड, लक्ष्मण गावड, उमेश चुरी यांनी सांगितले. प्लास्टिकचा विळखा समुद्रातील तिवरांच्या झाडांना बसून आगामी काळात कांदळवनांचे अस्तित्व धोक्यात येण्यासह सागरी जैव विविधतेची हानी होणार आहे. समुद्री कासवांचा हा विणीचा हंगाम असल्याने अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येणाऱ्या कासवांसाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्याने पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. >किनाऱ्यावर प्लास्टिकचे साम्राज्य पसरल्याने पर्यावरणाची हानी, परिसराचे विदु्रपीकरण तसेच स्थानिकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम होत आहे.- उमेश चुरी, चिखले गावातील नागरिक