शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
2
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
3
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
4
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
5
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
6
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
7
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
8
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
9
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
10
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
11
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
12
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
13
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
14
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
15
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
16
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
17
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
18
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
20
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच प्रेरणास्थान - आमीर खान

By admin | Updated: April 10, 2016 03:19 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निर्भय होते. त्यांनी प्रेमासह सहचाराची, मानवतेची शिकवण दिली. त्यांनी लोकांवर प्रेम केले आणि मानवतेचा विचार केला. बाबासाहेबांनी आयुष्यात कधीच हार मानली

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निर्भय होते. त्यांनी प्रेमासह सहचाराची, मानवतेची शिकवण दिली. त्यांनी लोकांवर प्रेम केले आणि मानवतेचा विचार केला. बाबासाहेबांनी आयुष्यात कधीच हार मानली नाही. ते निर्भय होते. म्हणून आजही मला अडचणी आल्या किंवा समस्यांना सामोरे जावे लागले. परिस्थिती अत्यंत कठीण झाली की मी बाबासाहेबांची आठवण काढतो. त्यामुळे मला प्रेरणा मिळते. म्हणून बाबासाहेब हेच माझे प्रेरणास्थान आहेत, असे उद्गार बॉलीवूड अभिनेते आमीर खान याने काढले.राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या वतीने वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानावर शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या ‘बाबासाहेबांच्या विचारांचा महोत्सव’ या कार्यक्रमात आमीर खान बोलत होता. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, नेपाळचे कॅबिनेट मंत्री विश्वेंद्र पासवान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर, ज्येष्ठ संगीतकार हरिहरन, संगीतकार जतीनललित, नाटयनिर्माते राहुल भंडारे, मुंबई स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चव्हाण, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.विश्वेंद्र पासवान यांनी उपस्थितांना बाबासाहेबांची समता, बंधुता आणि न्यायाची शिकवण अंमलात आणावी, असे आवाहन केले. प्रकाश आंबेडकर यांनीही परिवर्तनाची भावना कृतीत आणण्यासह पुस्तकातील बाबासाहेब माहिती करून घ्या, असे आवाहन केले. शिवाय रोहित वेमुला याची आई येत्या १४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता आंबेडकर भवन येथे बौद्ध धर्माची दिक्षा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. हर्षदीप कांबळे यांनी पुढील पंचवीस वर्षे आमची समिती विद्यार्थ्यांच्या आणि उद्योजकांच्या मदतीसाठी व महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणार असल्याचे नमुद केले. दरम्यान, यावेळी गायक अभिजित कोसंबी, गायिका रैना अग्नी, तबलानवाज मुकेश जाधव आणि श्याम जावडा या कलाकारांनी आपआपली कला सादर करत रसिकप्रेक्षकांचे तब्बल पाच तास मनोरंजन केले. शिवाय यावेळी कलाकार राजेश ढावरे यांच्या ‘द ट्रू सन आॅफ इंडिया : डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या अल्बमचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. (प्रतिनिधी)आमीर खान याने आपल्या भाषणाची सुरुवातच ‘जय भीम...’ असे म्हणत केली. तो म्हणाला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला मला बोलावण्यात आले याचा आनंद आहे. त्यामुळे मी आयोजकांचे आभार मानतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान पुरुष होते. बाबासाहेब केवळ दलितांचे नाही तर विश्वाचे नेते आहेत. बाबासाहेबांना मी माझे नेते मानतो. त्यांनी समानतेची शिकवण दिली असून, आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. बाबासाहेबांनी आपणाला जी शिकवण दिली. जे विचार दिले. ते सत्यात उतरवण्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या मार्गावर चालण्याची गरज आहे. विशेषत: बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालताना त्यांची पुस्तकेही वाचा, असे आवाहन आमीर याने केले.