शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

डॉ. आंबेडकर तलाव झाला दुर्गंधीमुक्त

By admin | Updated: September 21, 2015 14:41 IST

गणपती विसर्जनासाठी मालाड (पूर्व) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलाव आता दुर्गंधीमुक्त झाला आहे. त्यामुळे दिंडोशी परिसरातील गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई : गणपती विसर्जनासाठी मालाड (पूर्व) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलाव आता दुर्गंधीमुक्त झाला आहे. त्यामुळे दिंडोशी परिसरातील गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुर्गंधीयुक्त आणि गढूळ पाणी अशी ओळख असलेल्या या तलावात आॅक्सिजनयुक्त स्वच्छ पाणी सोडण्यात आले. यामुळे कुरारवासीयांची मोठी सोय झाली आहे. मालाड पूर्व हायवेजवळ असलेल्या कुरार व्हिलेज येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तलावाचे गेल्यावर्षी म्हाडातर्फे सुशोभिकरण करण्यात आले. पाणी साठण्याच्या जागी सिमेंट काँक्रिट ओतल्याने नैसर्गिक पाण्याचे स्रोत बंद झाले. पाणी झिरपणे बंद झाल्यामुळे या पाण्यात शेवाळ साठून पाण्याला हिरवा रंग आला होता. शिवाय पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे जीवजंतू वाढून पाण्याला प्रचंड दुर्गंधी आली होती. लाखो रुपये खर्चूनही काम न झाल्याने येथे येणारे नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक नाराजी व्यक्त करीत होते. या बाबीची दखल घेत आमदार सुनील प्रभू आणि पालिका अधिकाऱ्यांनी तलावाची पाहणी केली. त्यानंतर तलावाच्या पाण्यात आॅक्सिजन आणि स्वच्छ पाणी सोडण्याचे तसेच गणपती विसर्जनासाठी सर्व सोयी उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रभू यांनी दिले. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार कायमस्वरूपी फिल्टरेशन बसवण्याचे आश्वासन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यावेळी दिले. यावेळी नगरसेवक प्रशांत कदम, सुनील गुजर, गणपत वारिसे यांच्यासह शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या तलावाचे हस्तांतरण महानगर पालिकेकडे केल्यास त्याचे सुशोभिकरण आणि स्वच्छता राखणे सोयीचे होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्तांशी चर्चा झाली आहे. त्यामुळे या तलावाचा महापालिकेकडे हस्तांतरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र केवळ गणेशोत्सवापुरतेच नव्हे, तर कायमस्वरूपी या तलावाकडे लक्ष देण्यात यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली (प्रतिनिधी)