शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

दारूकांडात हत्येचे कलम जोडणार

By admin | Updated: July 10, 2015 03:58 IST

मालवणी दारूकांडातील आरोपींनी कट रचून १०४ जणांची हत्या केली, या निष्कर्षापर्यंत गुन्हे शाखा पोहोचली आहे. त्यानुसार या प्रकरणी गजाआड असलेल्या

जयेश शिरसाट  मुंबईमालवणी दारूकांडातील आरोपींनी कट रचून १०४ जणांची हत्या केली, या निष्कर्षापर्यंत गुन्हे शाखा पोहोचली आहे. त्यानुसार या प्रकरणी गजाआड असलेल्या ९ आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविण्याचा निर्णयही गुन्हे शाखेने घेतला आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकेल.१८ जूनला मालवणीतल्या ३ गुत्त्यांवरील गावठी दारूमुळे विषबाधा होऊन १०४ जणांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन व व्हिसेरा चाचणीतून मृतांच्या शरीरात निव्वळ मिथेनॉल हे विषारी औद्योगिक रसायन आढळले. या गुत्त्यांवरून मिथेनॉलमिश्रित पाणी गावठी दारू म्हणून ग्राहकांना पाजण्यात आली हे स्पष्ट झाले.या प्रकरणी मन्सूर लतीफ खान उर्फ आतीक, किशोर पटेल, सलीमुद्दीन शेख आणि फ्रान्सीस डीमेलो हे चार मुख्य आरोपी आहेत. एरव्ही गुत्त्यांवर गावठी दारूमुळे अधिक नशा यावी म्हणून त्यात काही प्रमाणात मिथेनॉल मिसळण्याची प्रथा रूढ होती. पण या प्रकरणात तर गावठी नव्हतीच; फक्त मिथेनॉलच होते, असे गुन्हे शाखेच्या तपासातून पुढे आले.मिथेनॉल विषारी असून, ते जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास तो माणूस दगावू शकतो, याची जाणीव चौघांनाही होती. हत्येचे कलम जोडण्यासाठी आरोपींचा हेतू किंवा इरादा स्पष्ट होणे आवश्यक होते. त्याशिवाय हे कलम न्यायालयात टीकू शकले नसते. मात्र आरोपींचा हेतू स्पष्ट झाला असून, तो न्यायालयात सिद्ध होईल इतपत पुरावे हाती आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली. अटक आरोपींचे उद्या रिमांड असून, त्याआधीच मालवणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात हत्येचे कलम जोडण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळते.