शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

कोकणात पावसामुळे अनेक घरांची पडझड

By admin | Updated: May 13, 2017 21:48 IST

जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी घरांचे नुकसान झाले. वादळी वा-यामुळे घरावर झाडे कोसळून नुकसान झाले आहे.

ऑनलाइन लोकमत 

रत्नागिरी, दि. 13 - शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी घरांचे नुकसान झाले. वादळी वा-यामुळे घरावर झाडे कोसळून नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण २ लाख ५ हजार ९०० रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. सर्वत्र एकूण ४०.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस मंडणगड तालुक्यात झाला.
 
शुक्रवारी ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट व वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी तुरळक शिडकावा झाला. मात्र, अनेक भागात जोरदार पाऊस झाला. राजापूर परिसरात गारा कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. मंडणगड तालुक्यात सर्वाधिक २३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 
 
संगमेश्वर तालुक्यात ११, लांजा ६.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. खेड, दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर तालुक्यात शून्य मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.  मंडणगड तालुक्यातील मौजे आतले येथील जितेंद्र जाधव, सुहास सावंत, भागवत जाधव, गंगाराम करवडे, अशोक करवडे यांच्या घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. मौजे नाचणे येथील बाजी दळवी, मौजे देव्हारे येथील वसंत तांबे, नरेश तांबे, साबरी गावातील अर्जुन धोंडू पोरदुरे, वेरळ येथील मारूती पिंगळे, तसेच कुडूल भू येथील सचिन शिगवण यांच्या घरांचे वादळी वाºयामुळे  नुकसान झाले आहे.
 
दापोली तालुक्यातील आंजर्ले येथे डी. के. सारंगकर यांच्या घराची पडवी कोसळून ९० हजारांचे नुकसान झाले आहे. तसेच सुधाकर कृष्णा भोसले यांच्या घरावर माडाचे झाड कोसळून ४५ हजारांचे नुकसान झाले. साखरोली येथे विलास महादेव वाजवेकर यांच्या घराचे ५,५०० रूपयांचे नुकसान झाले, परंतु जीवितहानी झाली नाही. खेड तालुक्यातील मौजे खारी येथील रमेश दाजी भुवड यांच्या घराच्या आवारात वणवा लागून २ बैल व एक गाय मृत्यूमुखी पडली.