शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

दुष्काळग्रस्तांचे परीक्षा शुल्क माफ

By admin | Updated: December 24, 2015 02:20 IST

राज्यातील पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

पुणे : राज्यातील पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या साडेचार लाख विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ झाले आहे.शासनाने पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या गावांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार संबंधित गावांतील दहावीतील मुलांचे परीक्षा अर्ज भरून घेताना त्यांच्याकडून शुल्क आकारण्यात आले नाही. राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे म्हणाले, आतापर्यंत ४ लाख ४९ हजार ३७७ विद्यार्थ्यांना शुल्क आकारण्यात आले नसल्याची माहिती राज्यातील सर्व विभागीय मंडळांकडून कळविण्यात आली आहे. त्यात नाशिक, औरंगाबाद व लातूर विभागातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असून मुंबई, कोकण विभागातील एकाही विद्यार्थ्याचे शुल्क माफ झाले नाही. नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या नागपूर ग्रामीण मधील १११ गावांमधील १३१ विद्यार्थ्यांचे आणि गडचिरोली जिल्ह्णातील ३६७ गावांमधील १ हजार ९०७ विद्यार्थ्यांचे शुल्क माफ झाले आहे. वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्णात एकही गाव दुष्काळग्रस्त नसल्याने येथील विद्यार्थ्यांना शुल्क माफी मिळाली नाही.मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील म्हणाले, अमरावती विभागातील बुलढाणा, अकोला व यवतमाळ जिल्ह्णात दुष्काळग्रस्त गावे आहेत. मात्र, या जिल्ह्णातील शाळांपर्यंत परीक्षा शुल्क माफ केले जाणार असल्याची माहिती न पोहचल्यामुळे या विभागातील सर्व विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारणी करण्यात आली आहे. परंतु, जिल्हा प्रशासन स्तरावर हा प्रश्न सोडविला जाणार असल्याचेही मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)