शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

धर्मांतरावर केंद्राच्या भूमिकेवर जनतेच्या मनात शंका - उद्धव ठाकरे

By admin | Updated: December 22, 2014 10:36 IST

हिंदुत्वाच्या नावाने जो धर्मांतरणाचा जागर देशात सुरू आहे त्यास सरकारचा पाठिंबा खरोखरच आहे काय? याविषयी जनतेच्या मनात शंका आहे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २२ - केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून देशभरातील हिंदूत्ववादी संघटनांना जोर चढला आहे. मोदींनी सर्वांना संयमाने वागा अशी तंबी दिली असली तरी हिंदुत्वाच्या नावाने जो धर्मांतरणाचा जागर देशात सुरू आहे त्यास सरकारचा पाठिंबा खरोखरच आहे काय? याविषयी जनतेच्या मनात शंका आहे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

धर्मांतराच्या वादाविषयी उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामध्ये भाष्य केले आहे. देशात मोगल काळापासून धर्मांतर सुरु आहे. पोर्तुगिज, ब्रिटीश आणि मोगल या सर्वांनी हिंदूंचे धर्मांतर केले गेले होते. तर आत्ताच्या काळात आदिवासी व दलितांच्या गरिबीचा फायदा घेत धर्मांतर केले जाते यावर धर्मनिरपेक्षवाद्यांचे काय म्हणणे आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तलवार आणि पैशाचा वापर करुन जगभरात धर्मांतर होत आले आहे. आता फक्त गंगा उलटी वाहू लागल्यावर निधर्मीवाद्यांनी धर्मांतर योग्य नसल्याची आवई उठवली आहे अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू महासभा या संघटना धर्मांतराचे स्वागत करत असून भाजपामधील मोठा वर्ग धर्मांतराच्या बाजूने आहे, पण सत्तेवर असल्याने त्यांची पंचाईत झाल्याचे उद्धव ठाकरेंनी नमूद केले. हिंदूत्ववादी संघटनांनी परभारे व परस्पर जे उपक्रम चालवले आहेत त्यामुळे मोदी सरकारला तोटा होईल का याचाही विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.