शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

धर्मांतरावर केंद्राच्या भूमिकेवर जनतेच्या मनात शंका - उद्धव ठाकरे

By admin | Updated: December 22, 2014 10:36 IST

हिंदुत्वाच्या नावाने जो धर्मांतरणाचा जागर देशात सुरू आहे त्यास सरकारचा पाठिंबा खरोखरच आहे काय? याविषयी जनतेच्या मनात शंका आहे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २२ - केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून देशभरातील हिंदूत्ववादी संघटनांना जोर चढला आहे. मोदींनी सर्वांना संयमाने वागा अशी तंबी दिली असली तरी हिंदुत्वाच्या नावाने जो धर्मांतरणाचा जागर देशात सुरू आहे त्यास सरकारचा पाठिंबा खरोखरच आहे काय? याविषयी जनतेच्या मनात शंका आहे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

धर्मांतराच्या वादाविषयी उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामध्ये भाष्य केले आहे. देशात मोगल काळापासून धर्मांतर सुरु आहे. पोर्तुगिज, ब्रिटीश आणि मोगल या सर्वांनी हिंदूंचे धर्मांतर केले गेले होते. तर आत्ताच्या काळात आदिवासी व दलितांच्या गरिबीचा फायदा घेत धर्मांतर केले जाते यावर धर्मनिरपेक्षवाद्यांचे काय म्हणणे आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तलवार आणि पैशाचा वापर करुन जगभरात धर्मांतर होत आले आहे. आता फक्त गंगा उलटी वाहू लागल्यावर निधर्मीवाद्यांनी धर्मांतर योग्य नसल्याची आवई उठवली आहे अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू महासभा या संघटना धर्मांतराचे स्वागत करत असून भाजपामधील मोठा वर्ग धर्मांतराच्या बाजूने आहे, पण सत्तेवर असल्याने त्यांची पंचाईत झाल्याचे उद्धव ठाकरेंनी नमूद केले. हिंदूत्ववादी संघटनांनी परभारे व परस्पर जे उपक्रम चालवले आहेत त्यामुळे मोदी सरकारला तोटा होईल का याचाही विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.