शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

धर्मांतरावर केंद्राच्या भूमिकेवर जनतेच्या मनात शंका - उद्धव ठाकरे

By admin | Updated: December 22, 2014 10:36 IST

हिंदुत्वाच्या नावाने जो धर्मांतरणाचा जागर देशात सुरू आहे त्यास सरकारचा पाठिंबा खरोखरच आहे काय? याविषयी जनतेच्या मनात शंका आहे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २२ - केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून देशभरातील हिंदूत्ववादी संघटनांना जोर चढला आहे. मोदींनी सर्वांना संयमाने वागा अशी तंबी दिली असली तरी हिंदुत्वाच्या नावाने जो धर्मांतरणाचा जागर देशात सुरू आहे त्यास सरकारचा पाठिंबा खरोखरच आहे काय? याविषयी जनतेच्या मनात शंका आहे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

धर्मांतराच्या वादाविषयी उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामध्ये भाष्य केले आहे. देशात मोगल काळापासून धर्मांतर सुरु आहे. पोर्तुगिज, ब्रिटीश आणि मोगल या सर्वांनी हिंदूंचे धर्मांतर केले गेले होते. तर आत्ताच्या काळात आदिवासी व दलितांच्या गरिबीचा फायदा घेत धर्मांतर केले जाते यावर धर्मनिरपेक्षवाद्यांचे काय म्हणणे आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तलवार आणि पैशाचा वापर करुन जगभरात धर्मांतर होत आले आहे. आता फक्त गंगा उलटी वाहू लागल्यावर निधर्मीवाद्यांनी धर्मांतर योग्य नसल्याची आवई उठवली आहे अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू महासभा या संघटना धर्मांतराचे स्वागत करत असून भाजपामधील मोठा वर्ग धर्मांतराच्या बाजूने आहे, पण सत्तेवर असल्याने त्यांची पंचाईत झाल्याचे उद्धव ठाकरेंनी नमूद केले. हिंदूत्ववादी संघटनांनी परभारे व परस्पर जे उपक्रम चालवले आहेत त्यामुळे मोदी सरकारला तोटा होईल का याचाही विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.