शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आठवड्यात जलसाठा दुप्पट

By admin | Updated: August 4, 2014 03:27 IST

गेल्या आठवडाभरापासून राज्यभर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे राज्याच्या जलसाठ्यात दुपटीने वाढ झाली आहे.

नरेश हाळणोर, नाशिकगेल्या आठवडाभरापासून राज्यभर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे राज्याच्या जलसाठ्यात दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक विभागांतील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली असून, राज्यातील मोठ्या धरणांच्या साठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. पावसाळा सुरू होऊन पावणे दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरीही समाधानकारक पाऊस नसल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच अनेक ठिकाणच्या धरणांच्या पातळीत कमालीची घट झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने कपातीची वेळ ओढवली होती. २२ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यात अवघा २४ टक्केच जलसाठा शिल्लक होता. मात्र, १० दिवसांपासून राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्याने मोठे, मध्यम व लघू जलसाठा प्रकल्पांतील पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, आजमितीस (दि. २) राज्यातील जलसाठ्यात २४ टक्क्यांनी वाढ होऊन आता तो ४८ टक्के झाला आहे.